शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

चिपळे, शांतिवन पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 02:25 IST

डांबर उखडले : खांब जीर्ण, लोखंड गंजल्याने नागरिकांच्या जिवास धोका

मयुर तांबडेपनवेल : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, गाढी नदीला आलेल्या महापुरामुळे चिपळे व शांतिवन पुलाला धोका निर्माण झाला आहे. चिपळे पुलाचा पत्रा खाली लोंबकळत आहे, तर शांतिवन येथील पुलावरून पाणी गेल्यामुळे काही ठिकाणी डांबर वाहून गेला आहे. काही ठिकाणी पुलावर पाण्याचे बुडबुडे निघू लागले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्हा परिषदेच्या शांतिवन पुलाच्या खालील बांधकामाचे लोखंड उघडे पडले असून ते गंजू लागले आहे. त्यामुळे हा पूल खचण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. २००५ मध्ये झालेल्या महापुरामध्ये शांतिवन पुलाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी पुलाचे डागडुजी करण्यात आली होती. सध्या पुलाखालील सिमेंटचे काँक्रिटीकरण निखळत चालले असून, पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

शनिवारी पुलावरून पाणी वाहून गेले. यावेळी प्रवाहही वेगात असल्याने पुलावर काही ठिकाणी डांबर वाहून गेले. पुलावरून पाणी जाऊ लागल्याने वाहतूकही बंद करण्यात आली होती.धोकादायक बनलेल्या चिपळे पुलाच्या लोखंडी सळ्या लटकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. तालुक्यात गाढी नदीवर १९७५ मध्ये पूल बांधण्यात आला आहे. पुलाचे आयुर्मान ५० वर्षे असून, पुलाला ४३ वर्षे होऊन गेलेली आहेत. मात्र, सद्यस्थितीत पूल जीर्ण झाला असून, लोखंडी सळ्या पाण्यात लटकू लागल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलाचे रेलिंगदेखील काही ठिकाणी तुटले आहे. शनिवारी, २७ जुलै रोजी पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी गेले असल्याने नागरिक भयभीत झाले होते.

चिपळे पुलाचे डागडुजीकरणाचे २३ लाखांचे काम अपूर्ण स्थितीत आहे. ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने लोखंडी सळ्या जैसे थे आहेत. पुलाची डागडुजी, रंगकाम, रेलिंग दुरुस्ती पावसाळयापूर्वी काम पूर्ण करण्यात आलेले नाही. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे झालेले नाही. त्यामुळे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :panvelपनवेलRainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई