शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

चिपळे, शांतिवन पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 02:25 IST

डांबर उखडले : खांब जीर्ण, लोखंड गंजल्याने नागरिकांच्या जिवास धोका

मयुर तांबडेपनवेल : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, गाढी नदीला आलेल्या महापुरामुळे चिपळे व शांतिवन पुलाला धोका निर्माण झाला आहे. चिपळे पुलाचा पत्रा खाली लोंबकळत आहे, तर शांतिवन येथील पुलावरून पाणी गेल्यामुळे काही ठिकाणी डांबर वाहून गेला आहे. काही ठिकाणी पुलावर पाण्याचे बुडबुडे निघू लागले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्हा परिषदेच्या शांतिवन पुलाच्या खालील बांधकामाचे लोखंड उघडे पडले असून ते गंजू लागले आहे. त्यामुळे हा पूल खचण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. २००५ मध्ये झालेल्या महापुरामध्ये शांतिवन पुलाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी पुलाचे डागडुजी करण्यात आली होती. सध्या पुलाखालील सिमेंटचे काँक्रिटीकरण निखळत चालले असून, पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

शनिवारी पुलावरून पाणी वाहून गेले. यावेळी प्रवाहही वेगात असल्याने पुलावर काही ठिकाणी डांबर वाहून गेले. पुलावरून पाणी जाऊ लागल्याने वाहतूकही बंद करण्यात आली होती.धोकादायक बनलेल्या चिपळे पुलाच्या लोखंडी सळ्या लटकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. तालुक्यात गाढी नदीवर १९७५ मध्ये पूल बांधण्यात आला आहे. पुलाचे आयुर्मान ५० वर्षे असून, पुलाला ४३ वर्षे होऊन गेलेली आहेत. मात्र, सद्यस्थितीत पूल जीर्ण झाला असून, लोखंडी सळ्या पाण्यात लटकू लागल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलाचे रेलिंगदेखील काही ठिकाणी तुटले आहे. शनिवारी, २७ जुलै रोजी पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी गेले असल्याने नागरिक भयभीत झाले होते.

चिपळे पुलाचे डागडुजीकरणाचे २३ लाखांचे काम अपूर्ण स्थितीत आहे. ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने लोखंडी सळ्या जैसे थे आहेत. पुलाची डागडुजी, रंगकाम, रेलिंग दुरुस्ती पावसाळयापूर्वी काम पूर्ण करण्यात आलेले नाही. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे झालेले नाही. त्यामुळे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :panvelपनवेलRainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई