शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

चिपळे, शांतिवन पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 02:25 IST

डांबर उखडले : खांब जीर्ण, लोखंड गंजल्याने नागरिकांच्या जिवास धोका

मयुर तांबडेपनवेल : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, गाढी नदीला आलेल्या महापुरामुळे चिपळे व शांतिवन पुलाला धोका निर्माण झाला आहे. चिपळे पुलाचा पत्रा खाली लोंबकळत आहे, तर शांतिवन येथील पुलावरून पाणी गेल्यामुळे काही ठिकाणी डांबर वाहून गेला आहे. काही ठिकाणी पुलावर पाण्याचे बुडबुडे निघू लागले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्हा परिषदेच्या शांतिवन पुलाच्या खालील बांधकामाचे लोखंड उघडे पडले असून ते गंजू लागले आहे. त्यामुळे हा पूल खचण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. २००५ मध्ये झालेल्या महापुरामध्ये शांतिवन पुलाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी पुलाचे डागडुजी करण्यात आली होती. सध्या पुलाखालील सिमेंटचे काँक्रिटीकरण निखळत चालले असून, पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

शनिवारी पुलावरून पाणी वाहून गेले. यावेळी प्रवाहही वेगात असल्याने पुलावर काही ठिकाणी डांबर वाहून गेले. पुलावरून पाणी जाऊ लागल्याने वाहतूकही बंद करण्यात आली होती.धोकादायक बनलेल्या चिपळे पुलाच्या लोखंडी सळ्या लटकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. तालुक्यात गाढी नदीवर १९७५ मध्ये पूल बांधण्यात आला आहे. पुलाचे आयुर्मान ५० वर्षे असून, पुलाला ४३ वर्षे होऊन गेलेली आहेत. मात्र, सद्यस्थितीत पूल जीर्ण झाला असून, लोखंडी सळ्या पाण्यात लटकू लागल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलाचे रेलिंगदेखील काही ठिकाणी तुटले आहे. शनिवारी, २७ जुलै रोजी पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी गेले असल्याने नागरिक भयभीत झाले होते.

चिपळे पुलाचे डागडुजीकरणाचे २३ लाखांचे काम अपूर्ण स्थितीत आहे. ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने लोखंडी सळ्या जैसे थे आहेत. पुलाची डागडुजी, रंगकाम, रेलिंग दुरुस्ती पावसाळयापूर्वी काम पूर्ण करण्यात आलेले नाही. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे झालेले नाही. त्यामुळे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :panvelपनवेलRainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई