शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

धरणा कॅम्प शाळा पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 27, 2015 02:42 IST

कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्यरीत्या पुनर्वसन सरकारने केलेच नाही. पनवेल तालुक्यातील धरणा कॅम्प येथील

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीकोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्यरीत्या पुनर्वसन सरकारने केलेच नाही. पनवेल तालुक्यातील धरणा कॅम्प येथील शाळेचीही दुरवस्था झाली असून जिल्हा परिषदेकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने ८५ विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीत शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. १९६१ साली सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील करंजावडे गावातून कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे स्थानिक मंडळी बाधित झाली. सरकारने त्यातील काही कुटुंबांचे पुनर्वसन पनवेल तालुक्यातील रोहिंजन गावालगत केले. भवानीनगर म्हणून ओळखला जाणारा हा धरणाकॅम्प सध्या अनेक समस्यांनी त्रस्त आहे. या ठिकाणी तीन वर्गखोल्यांमध्ये शाळा भरविली जात असली तरी तिन्हींची दुर्दशा झाली आहे. एक वर्ग तर पूर्णत: मोडकळीस आला असल्याने या ठिकाणी मुलांना बसविण्यात येत नाही. दुसऱ्या दोन खोल्यात शाळा भरविली जात असून त्या छताला गळती लागली आहे. पावसाळा सुरू असल्याने वर्गावर ताडपत्री टाकून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेच्या भिंतीला तडे गेले आहेत, वर्गखोल्यांच्या लाद्याही उखडल्या आहेत. अनेकदा विद्यार्थी त्यात अडकून पडतात. येथील शौचालयाची स्थिती अतिशय वाईट असून त्याला दरवाजे नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या संदर्भात अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाचे सहसचिव आर.टी.कदम यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शिवाय वारंवार पाठपुरावाही केला आहे, तरी सुध्दा त्वरित उपाययोजना केल्या जात नाही. तीनही वर्गखोल्या जमीनदोस्त करून नवीन इमारत बांधण्याची आमची मागणी असल्याचे ग्रामस्थ संदीप पवार यांनी सांगितले.