शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

धरणाचे पाणी बिल्डरला!

By admin | Updated: April 19, 2017 00:40 IST

तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आणि शेतीला पाणी देण्यासाठी पाली भूतीवली धरणाची निर्मिती शासनाने केली आहे.

विजय मांडे , कर्जततालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आणि शेतीला पाणी देण्यासाठी पाली भूतीवली धरणाची निर्मिती शासनाने केली आहे. या धरणाचे पोद्दार बिल्डरला दिलेले पाणी आजही सुरूच आहे. त्यांच्यासाठी करण्यात आलेला करार डिसेंबर २०१६ मध्ये संपला आहे, असे असताना स्थानिक आमदारांच्या पत्रानंतर पाटबंधारे विभागाने कराराची मुदत वाढविली नाही. परंतु पाटबंधारे विभाग पोद्दार बिल्डरचा पाणीपुरवठा तोडण्याची हिंमत करीत नाही.२००४ मध्ये पाटबंधारे बांधलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा झाला होता. त्यावेळी शेतीसाठी पाणी सोडण्याकरिता कालव्यांची कामे सुरळीत न झाल्याने आजतागायत धरणाचे पाणी शेतीसाठी पोहचू शकले नाही. दुसरीकडे धरणातील पाणी डिकसळ भागात इमारती बांधणाऱ्या पोद्दार बिल्डरला पंप लावून पाणी उचलण्यास पाटबंधारे विभागाने परवानगी दिली. त्यानंतर धरणाचे पिण्याच्या अटीवर देण्यात आलेल्या पाण्यावर पोद्दार बिल्डरने १०० इमारती उभ्या केल्या असून पोद्दार बिल्डरला धरणातून पाणी उचलण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेली मुदत डिसेंबर२०१६ मध्ये संपली आहे. शेतीसाठी पाणी आवश्यक असल्याने स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी शासनाला पत्र लिहून पोद्दारसारख्या खासगी संस्थांना धरणातून पाणी उचलण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. त्याबाबत आमदार लाड यांनी विधिमंडळात प्रश्न देखील उपस्थित केला असता पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी करार वाढवून दिला जाणार नाही असे उत्तर दिले होते. मात्र पाटबंधारे विभागाचे कोलाड कार्यालयाने आजपर्यंत पोद्दार बिल्डरचा पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.डिसेंबर २०१६ रोजी पोद्दार बिल्डरच्या धरणात असलेल्या बोटी काढून टाकण्याची कार्यवाही पाटबंधारे खात्याने करण्याची गरज असताना मागील चार महिने पाटबंधारे विभागातील कोणता अधिकारी आणि कोणासाठी पाणीपुरवठा करीत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोद्दार बिल्डरने तेथील घरे राहत असलेल्या लोकांना पैसे घेऊन विकली आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी पाणीपुरवठा करणे ही बिल्डरची आणि आता तेथील रहिवाशांकडून कर भरणा करीत असलेल्या उमरोली ग्रामपंचायतीने योजना करण्याची गरज आहे. परंतु असे काहीही होत नसून पोद्दार बिल्डरच्या वसाहतीत राहत असलेल्या रहिवाशांना धरणातून बेकायदा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत शासन पाटबंधारे विभागाचे अधिकारी कारवाई करणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्याचवेळी चार महिने शासनाने कराराची मुदत वाढवून दिलेली नसताना पाणीपुरवठा सुरू ठेवणाऱ्या अधिकारी वर्गाकडून पाणीपट्टी वसूल करण्याची मागणी स्थानिक शेतकरी करीत आहेत.