शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

धरणाचे पाणी बिल्डरला!

By admin | Updated: April 19, 2017 00:40 IST

तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आणि शेतीला पाणी देण्यासाठी पाली भूतीवली धरणाची निर्मिती शासनाने केली आहे.

विजय मांडे , कर्जततालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आणि शेतीला पाणी देण्यासाठी पाली भूतीवली धरणाची निर्मिती शासनाने केली आहे. या धरणाचे पोद्दार बिल्डरला दिलेले पाणी आजही सुरूच आहे. त्यांच्यासाठी करण्यात आलेला करार डिसेंबर २०१६ मध्ये संपला आहे, असे असताना स्थानिक आमदारांच्या पत्रानंतर पाटबंधारे विभागाने कराराची मुदत वाढविली नाही. परंतु पाटबंधारे विभाग पोद्दार बिल्डरचा पाणीपुरवठा तोडण्याची हिंमत करीत नाही.२००४ मध्ये पाटबंधारे बांधलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा झाला होता. त्यावेळी शेतीसाठी पाणी सोडण्याकरिता कालव्यांची कामे सुरळीत न झाल्याने आजतागायत धरणाचे पाणी शेतीसाठी पोहचू शकले नाही. दुसरीकडे धरणातील पाणी डिकसळ भागात इमारती बांधणाऱ्या पोद्दार बिल्डरला पंप लावून पाणी उचलण्यास पाटबंधारे विभागाने परवानगी दिली. त्यानंतर धरणाचे पिण्याच्या अटीवर देण्यात आलेल्या पाण्यावर पोद्दार बिल्डरने १०० इमारती उभ्या केल्या असून पोद्दार बिल्डरला धरणातून पाणी उचलण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेली मुदत डिसेंबर२०१६ मध्ये संपली आहे. शेतीसाठी पाणी आवश्यक असल्याने स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी शासनाला पत्र लिहून पोद्दारसारख्या खासगी संस्थांना धरणातून पाणी उचलण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. त्याबाबत आमदार लाड यांनी विधिमंडळात प्रश्न देखील उपस्थित केला असता पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी करार वाढवून दिला जाणार नाही असे उत्तर दिले होते. मात्र पाटबंधारे विभागाचे कोलाड कार्यालयाने आजपर्यंत पोद्दार बिल्डरचा पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.डिसेंबर २०१६ रोजी पोद्दार बिल्डरच्या धरणात असलेल्या बोटी काढून टाकण्याची कार्यवाही पाटबंधारे खात्याने करण्याची गरज असताना मागील चार महिने पाटबंधारे विभागातील कोणता अधिकारी आणि कोणासाठी पाणीपुरवठा करीत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोद्दार बिल्डरने तेथील घरे राहत असलेल्या लोकांना पैसे घेऊन विकली आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी पाणीपुरवठा करणे ही बिल्डरची आणि आता तेथील रहिवाशांकडून कर भरणा करीत असलेल्या उमरोली ग्रामपंचायतीने योजना करण्याची गरज आहे. परंतु असे काहीही होत नसून पोद्दार बिल्डरच्या वसाहतीत राहत असलेल्या रहिवाशांना धरणातून बेकायदा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत शासन पाटबंधारे विभागाचे अधिकारी कारवाई करणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्याचवेळी चार महिने शासनाने कराराची मुदत वाढवून दिलेली नसताना पाणीपुरवठा सुरू ठेवणाऱ्या अधिकारी वर्गाकडून पाणीपट्टी वसूल करण्याची मागणी स्थानिक शेतकरी करीत आहेत.