शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

ऐरोलीत पन्नासपेक्षा अधिका झाडांची कत्तल; रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 23:30 IST

वृक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट; कारवाईची मागणी

अनंत पाटीलनवी मुंबई : ‘सुंदर नवी मुंबई, स्वच्छ नवी मुंबई’ शहराचे स्वप्न साकार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्चून वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, परंतु या वृक्षांचे संवर्धन व त्यांची होणारी कत्तल रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्यामुळे झाडांची कत्तल होत आहे. ऐरोली सेक्टर १५ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात ५० हून अधिक वृक्षांची कटर मशीनच्या साहाय्याने कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत वृक्षप्रेमींनी असंतोष व्यक्त केला आहे.

या प्रकरणी अज्ञात व्यक्तिंच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐरोली सेक्टर १५ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ ऐरोली - मुलुंड मार्गाला लागूनच रस्त्याच्या बाजूला महापालिकेच्या वतीने सुशोभीकरण करून गार्डन उभारले आहे. काही वृक्षप्रेमींनी महापालिकेच्या याच उद्यानासमोर झाडे लावली होती, परंतु या झाडांच्या संवर्धनाबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून ५० हून अधिक झाडांची कत्तल के ली आहे. रात्रीच्या वेळी हा प्रकार घडत असल्याचे वृक्षप्रेमींचे म्हणणे आहे.

नियमानुसार, वृक्षतोड करताना पालिकेच्या वृक्षतोड प्राधिकरणाकडून रीतसर परवानगी घेणे, वृक्ष समितीची मान्यता घेणे, सर्व्हे करून वृक्ष तोडण्याची खरेच गरज आहे का, हे तपासून पाहणे आवश्यक असते. मात्र, पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. वृक्षप्रेमी ममता महाराणा यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच, त्यांनी वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. नवी मुंबई महापालिकेचे ऐरोली उद्यान विभागाचे सहायक अधिकारी प्रशांत उरणकर यांनी रबाळे पोलिसांत तक्रार केल्यानंतर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.