शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी उठवताच पनवेलच्या बाजारपेठेत गर्दी; कोरोना साखळी तोडण्याच्या उद्देशाला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 23:55 IST

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; गांभीर्य नाही

कळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढत्या संख्येमुळे नागरिकांसह महापलिका प्रशासनाने धसका घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी आणि पनवेल परिसरातील कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी पनवेल महापलिका क्षेत्रात १९ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला होता. बुधवारी संचारबंदी उठविल्याने पनवेल येथील मार्केटमध्ये सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेल, कळंबोली, नवीन पनवेल, खारघर, कामोठे, तळोजा या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दिवसाला दिडशेच्या जवळपास रुग्ण आढळत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिका क्षेत्रात ३ जुलैपासून १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला. पुढे तो ११ दिवस वाढविण्यात आला होता. रहिवासी, लोकप्रतिनिधी, व्यापारी वर्गातून याचा विरोध होत असल्याने, २४ जुलैला संपणारे लॉकडाऊन दोन दिवस अगोदरच शिथिल करण्याचा निर्णय आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतला.

कंटेन्मेन्ट झोन आणि क्लस्टर कंटेन्मेन्ट झोन वगळता, पनवेल महापालिका क्षेत्रात अनलॉक करण्यात आला आहे. बुधवारी संचारबंदी उठवल्याने पनवेल रोज भाजी मार्केट, उरण नाका, टपाल नाका, लाइन आळी, गणेश मार्केट, कामोठे भाजी मार्केट, गोकुळ डेरी, कळंबोली येथील भाजी मार्केट, करवली नाका या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर, शहरातील पेट्रोल पंप, पिठाची गिरणी, बँक, मोबाइल दुकाने आदी साहित्य खरेसाठी नागरिकांनी मार्केटमध्ये गर्दी केली होती. कित्येत नागरिकांच्या तोंडावर मास्क नव्हते. कोरोना संसर्ग रोगाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे नागरिकांकडून नियमाची पायमल्ली होत आहे.

धोका कायम तरी नागरिक बिनधास्त

बुधवारी झालेल्या गर्दीने प्रशासनाचे सर्वच नियम पायदळी तुडवले. किराणा दुकान, पेट्रोल पंप, भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला, तर कित्येक नागरिक विना मास्क बिनधास्त फिरत होते. यामुळे नागरिकांत कोरोनाबाबत भय उरले नसल्याचे दिसून आले. नागरिक बिनधास्त वावरत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई