शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

रेल्वे मार्गावर घडणारी गुन्हेगारी नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 01:21 IST

कोरोनाचा परिणाम; अनलॉकनंतर घडले पंधरा गुन्हे

नवी मुंबई : कोरोनामुळे रेल्वे मार्गावर घडणारी गुन्हेगारीही नियंत्रणात आली आहे. केवळ शासकीय व्यक्ती व ठरावीक वेळीच सर्वसामान्यांना रेल्वेने प्रवासाची मुभा आहे. यामुळे गुन्हेगारांच्या हालचालींना लगाम लागल्याचे दिसून येत आहे.नवी मुंबईतल्या ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर अनेक गुन्हे घडत असतात. त्यापैकी बहुतांश गुन्हे हे गर्दीच्या वेळीच घडतात. लोकलमध्ये असलेली गर्दी हेरून प्रवाशांचे पाकीट मारणे, मोबाइल पळवणे, याशिवाय बॅग चोरणे असे गुन्हे घडत असतात. चालू वर्षातच अवघ्या जानेवारीमध्येच १७९ तर फेब्रुवारीमध्ये १५५ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे, परंतु लॉकडाऊननंतर अनलॉक झाल्यानंतर रेल्वे रुळावर येऊनही गुन्हेगारांना रेल्वेत शिरकाव करण्याची फारशी संधी मिळालेली नाही. यामुळे बऱ्याच अंशी गुन्हेगारी कृत्ये नियंत्रणात आली आहेत, तर अनलॉकनंतर पाच महिन्यांत केवळ अकरा गुन्ह्यांची नोंद वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यापैकी ८ गुन्ह्यांची उकलही पोलिसांनी केलेली आहे. लॉकडाऊननंतर रेल्वे पुन्हा सुरू होऊनही गर्दी होत नसल्याने चोरट्यांना हात मारण्याची संधीच मिळत नाहीये. यामुळे वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारीचा आलेख खाली आला आहे.   अनेकांच्या हातावर फटका मारून हातातली बॅग पळविल्याचेही प्रकार घडले आहेत. रेल्वे प्रवासा दरम्यान घडले  आहेत.सर्वाधिक गुन्हे कुठले?नवी मुंबईत रेल्वेतून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मोबाइल व बॅगचोरीचे सर्वाधिक गुन्हे आहेत. रेल्वेतल्या गर्दीची संधी साधून चोरी केली जात असल्याचे वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू केसरकर यांनी सांगितले, त्याशिवाय बॅग पळविणे, हातावर फटका मारून हातातली वस्तू पळविणे, असेही गुन्हे घडत असतात.रेल्वेत घडलेले गुन्हे रेल्वेत असलेली प्रवाशांची गर्दीच गुन्हेगारांना संधी देत असते. अशा गर्दीत घुसलेले चोरटे प्रवाशांचे पाकीट मारतात, शिवाय हातचलाखीने मोबाइलही पळवतात.