शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मार्गावर घडणारी गुन्हेगारी नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 01:21 IST

कोरोनाचा परिणाम; अनलॉकनंतर घडले पंधरा गुन्हे

नवी मुंबई : कोरोनामुळे रेल्वे मार्गावर घडणारी गुन्हेगारीही नियंत्रणात आली आहे. केवळ शासकीय व्यक्ती व ठरावीक वेळीच सर्वसामान्यांना रेल्वेने प्रवासाची मुभा आहे. यामुळे गुन्हेगारांच्या हालचालींना लगाम लागल्याचे दिसून येत आहे.नवी मुंबईतल्या ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर अनेक गुन्हे घडत असतात. त्यापैकी बहुतांश गुन्हे हे गर्दीच्या वेळीच घडतात. लोकलमध्ये असलेली गर्दी हेरून प्रवाशांचे पाकीट मारणे, मोबाइल पळवणे, याशिवाय बॅग चोरणे असे गुन्हे घडत असतात. चालू वर्षातच अवघ्या जानेवारीमध्येच १७९ तर फेब्रुवारीमध्ये १५५ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे, परंतु लॉकडाऊननंतर अनलॉक झाल्यानंतर रेल्वे रुळावर येऊनही गुन्हेगारांना रेल्वेत शिरकाव करण्याची फारशी संधी मिळालेली नाही. यामुळे बऱ्याच अंशी गुन्हेगारी कृत्ये नियंत्रणात आली आहेत, तर अनलॉकनंतर पाच महिन्यांत केवळ अकरा गुन्ह्यांची नोंद वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यापैकी ८ गुन्ह्यांची उकलही पोलिसांनी केलेली आहे. लॉकडाऊननंतर रेल्वे पुन्हा सुरू होऊनही गर्दी होत नसल्याने चोरट्यांना हात मारण्याची संधीच मिळत नाहीये. यामुळे वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारीचा आलेख खाली आला आहे.   अनेकांच्या हातावर फटका मारून हातातली बॅग पळविल्याचेही प्रकार घडले आहेत. रेल्वे प्रवासा दरम्यान घडले  आहेत.सर्वाधिक गुन्हे कुठले?नवी मुंबईत रेल्वेतून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मोबाइल व बॅगचोरीचे सर्वाधिक गुन्हे आहेत. रेल्वेतल्या गर्दीची संधी साधून चोरी केली जात असल्याचे वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू केसरकर यांनी सांगितले, त्याशिवाय बॅग पळविणे, हातावर फटका मारून हातातली वस्तू पळविणे, असेही गुन्हे घडत असतात.रेल्वेत घडलेले गुन्हे रेल्वेत असलेली प्रवाशांची गर्दीच गुन्हेगारांना संधी देत असते. अशा गर्दीत घुसलेले चोरटे प्रवाशांचे पाकीट मारतात, शिवाय हातचलाखीने मोबाइलही पळवतात.