शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

नेरुळच्या पादचारी पुलावरून श्रेयवाद, सेना-मनसेत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 02:37 IST

प्रशासनातही जुंपली : पुनर्बांधणीची गरज असतानाही रेल्वेकडून डागडुजीचा निर्णय

नवी मुंबई : नेरुळ येथील पादचारी पुलावरून शिवसेना-मनसेत श्रेयवाद सुरू झाला आहे. रेल्वेरुळावरील हा पूल धोकादायक झाल्याने वापरासाठी बंद करण्यात आला आहे. त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी महापालिकेने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही रेल्वेकडून केवळ पुलाच्या डागडुजीसाठी सकारात्मकता दर्शवली आहे, त्यास शिवसेनेचा विरोध असतानाच मनसेकडून आपल्याच प्रयत्नाने हा निर्णय झाल्याची फलकबाजी करण्यात आली आहे.

नेरुळ सेक्टर ८ येथे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पूल धोकादायक स्थितीत आहे. सुमारे २५ वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या पुलाची वेळोवेळी डागडुजी न झाल्याने पडझड सुरू आहे. पुलाला अनेक ठिकाणी तडेही गेल्याने त्यापासून असलेल्या संभाव्य धोक्याबाबत पादचाऱ्यांकडून चिंता व्यक्त होत आहे. अखेर गतमहिन्यापासून पालिकेने हा पूल वापरासाठी बंद केला आहे. परिणामी, पुलाच्या दोन्ही बाजूकडील नागरिकांना पायपीट करून दुसºया पादचारी पुलांचा आधार घ्यावा लागत आहे.यामुळे तत्कालीन पालिका आयुक्त रामास्वामी एन. स्थानिक नगरसेविका सुनीता मांडवे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून पुलाच्या पुनर्बांधणीची मागणी केली होती; परंतु रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. सदर पूल सिडकोने बांधलेला असल्याने रेल्वेकडून सिडकोकडेच जबाबदारी ढकलली जात होती. या संदर्भात ‘लोकमत’नेही वृत्त प्रसिद्ध केले होते. तर नागरिकांकडूनही रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर २४ जूनला रेल्वेने सदर पुलाच्या डागडुजीला संमती दर्शवत पालिकेला पत्राद्वारे तसे कळवले आहे. त्यासाठी ३१ लाख रुपये खर्चाची निविदाही प्रस्तावित आहे; परंतु डागडुजी करूनही पूल दुरुस्त होण्याच्या स्थितीत नसल्याने त्या ठिकाणी नवीनच पूल उभारला जावा, अशी भूमिका नगरसेविका सुनीता मांडवे यांनी तत्कालीन पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे मांडली असता, त्यांनीही त्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. मात्र, दुसºयाच दिवशी त्यांच्या बदलीनंतर या संदर्भातील निर्णय पुन्हा लांबणीवर गेला. अशातच ८ जुलैला अमित ठाकरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये नेरुळच्या धोकादायक पुलासंदर्भात अमित ठाकरे यांनी पाठपुरावा केल्यामुळेच रेल्वेने दुरुस्तीचा निर्णय घेतल्याचे मनसे विभाग अध्यक्ष अभिजित देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे, तर तशा प्रकारचे फलकही पुलाच्या परिसरात लावण्यात आले आहेत.पुलाबाबत रेल्वे प्रशासन, सिडको आणि महापालिका यांच्यातच अद्याप ठोस निर्णय होऊ शकलेला नाही, तर एक महिन्यापूर्वीच रेल्वेने जे पत्रक सिडको आणि महापालिकेला दिले आहे, तो निर्णय नुकताच झाल्याचे भासवून मनसेकडून जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा टोला युवासेनेचे उपविधानसभा अधिकारी निखिल मांडवे यांनी मारला आहे.नेरुळ सेक्टर ८ येथील जीर्ण झालेला पादचारी पूल पाडून त्या ठिकाणी नवा पूल उभारावा, यासाठी नागरिकांसह पालिकेचे प्रयत्न आहेत. त्यानंतरही रेल्वे प्रशासनाने केवळ पुलाच्या डागडुजीचा निर्णय घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेविषयी नेरुळच्या रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई