शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

कळंबोली वाहतूक शाखेच्या टोर्इंगमध्ये भ्रष्टाचार

By admin | Updated: July 29, 2016 02:33 IST

कळंबोली वाहतूक शाखेने बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोर्इंग चालू केले आहे. दररोज जवळपास ५० ते ६० हून अधिक वाहने टोचन करून नेली जातात मात्र शासकीय

- मयूर तांबडे, पनवेल

कळंबोली वाहतूक शाखेने बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोर्इंग चालू केले आहे. दररोज जवळपास ५० ते ६० हून अधिक वाहने टोचन करून नेली जातात मात्र शासकीय दरबारी केवळ १० ते १५ वाहनांचाच महसूल जमा होत असल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. त्यामुळे कळंबोली वाहतूक शाखेच्या टोर्इंग व्हॅनमध्ये महिन्याला लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याचे उघड झाले आहे. कळंबोली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, कोंडी दूर व्हावी यासाठी टोर्इंग व्हॅन सुरु करण्यात आली. मात्र त्यामुळे टोर्इंगवरील वाहतूक पोलीसच मालामाल होताना दिसत आहेत. नो पार्किंग क्षेत्रात गाडी लावणाऱ्या दररोज पन्नासहून अधिक दुचाकी तसेच जवळपास १० ते १५ चारचाकी वाहनांना टोचन करून नेले जाते. दुचाकीचे २०० रु पये तर चारचाकी वाहनाचे ३०० रु पये घेऊन गाडी सोडली जाते. मात्र यातील केवळ १० ते १५ दुचाकीस्वारांना दंड भरल्याच्या पावत्या दिल्या जात आहेत. एका दिवसाला जवळपास ५० दुचाकी गाड्यांना टोचन लावण्यात येत असेल तर दिवसाचे १० हजार रु पये दंड शासन दरबारी जमा व्हायला हवेत मात्र तसे न होता टोचनवरील वाहतूक पोलीस विनापावती पैसे घेतल्याचे चित्र कळंबोली वाहतूक शाखेत दिसत आहे. दररोज हजारो रु पये विनापावत्या जमा केले आहेत. कळंबोली वाहतूक शाखेकडील टोर्इंग व्हॅनद्वारे वाहनांवर २०१४ ते ५ जून २०१५ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती उपलब्ध नाही. तर जून १५ ते डिसेंबर २०१५ या वर्षामध्ये कळंबोली वाहतूक शाखेची टोर्इंग व्हॅन प्रत्येकी ४२ दिवस तर जानेवारी १६ ते जून १६ पर्यंत ३७ दिवस टोर्इंग व्हॅन बंद होती. उरलेल्या दिवसात केवळ २०४७ दुचाकी वाहनांकडून प्रत्येकी शंभर रु पयाप्रमाणे ३,४७,००० रु पयांचा दंड जमा करण्यात आला. तर १४३ चारचाकी वाहनांकडून प्रत्येकी १०० रु पयाप्रमाणे १४,३०० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र दुचाकीचे २०० रु पये घेतले जातात तर चारचाकी वाहनाचे ३०० रु पये घेऊन गाडी सोडली जाते. प्रत्यक्षात दोनशे रुपये घ्यायचे व पावती शंभर रु पयांची द्यायची असा प्रकार राजरोसपणे सुरूच आहे. या टोचनमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्यामुळे ती बंद करावी, अशी मागणी जोर धरत आहे.याबाबत कळंबोली वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक गोरख पाटील यांना विचारले असता जेवढ्या गाड्यांवर कारवाई होते तेवढ्या गाड्यांची माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीनिवास मुंडे यांच्याकडे टोचनमधील भ्रष्टाचाराबाबत विचारणा केली असता, टोचनवरील कर्मचाऱ्याला त्यांनी रजिस्टर आणायला सांगितले व चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.