शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

महानगरपालिकेची ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ मोहीम; आठही विभाग कार्यालय क्षेत्रांत सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 00:05 IST

शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेने युनिसेफच्या वतीने ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ मोहीम सुरू केली आहे. बस, रिक्षा, टॅक्सी, खासगी व सरकारी कार्यालयांमध्ये मास्क असल्याशिवाय परवानगी न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.  मास्कचा वापर करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे तसेच वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. मास्कचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासाठी  महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

आठही विभाग कार्यालय क्षेत्रांमध्ये  या मोहिमेचा शुभारंभ एकाच वेळी करण्यात आला. नेरूळ विभागातील शुभारंभप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके यांच्यासह युनिसेफच्या प्रतिनिधी   देविका देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिकेने या वेळी १ हजार मास्कचे वाटप करून मास्क कसा वापरावा आणि त्याची विल्हेवाट कशी लावावी याविषयी मार्गदर्शन केले. 

शहरातील मुख्य रस्ते, मोठे होर्डिंग, वर्दळीच्या ठिकाणी लाकडी होर्डिंग, एन.एम.एम.टी. बस पॅनल, दुकानांच्या ठिकाणी पोस्टर्स तसेच ध्वनिचित्रफीत व ध्वनिक्षेपकाद्वारे याविषयी जनजागृती केली जाणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. मास्क नसेल तर  बस-रिक्षा-टॅक्सी अशा सार्वजनिक वाहतुकीमध्ये, दुकानांमध्ये  प्रवेश देऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.  

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका