शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Coronavirus: कोरोनाने काय शिकवले?; मुक्या प्राण्यांना दिलं अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 00:11 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या वर्षी २२ मार्चपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. लॉकडाऊनपासून प्रत्येक जण घरात अडकला. या काळात कोरोनाने काय शिकवले? कोणता धडा दिला? त्याविषयी हे अनुभव.

पैसा, संपत्ती यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे, हेच सत्य कोरोनामुळे अधोरेखित झाले. कोरोना अजूनही गेलेला नाही. परंतु मागील वर्षभरात जीवनाचे खरे मूल्य कोरोनाने शिकविले. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात ताळेबंदी घोषित करण्यात आली. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. विशेषता हातावर पोट असलेल्या कष्टकरी वर्गाला याची सर्वाधिक झळ बसली. मुक्या प्राण्यांची ससेहोलपट सुरू झाली. बेवारस निराधारांवर उपासमारी ओढावली.  सुरुवातीच्या काही दिवसांतच याचे गांभीर्य माझ्या निदर्शनास आले.

त्यानुसार मी माझ्या मित्राच्या मदतीने योजना तयार केली. संकट मोठे होते. २१ मार्च रोजी दोन अन्य सहकाऱ्यांना सोबत घेऊन पदपथावर उपासमारीचे जीवन जगणाऱ्यांना  खाऊ आणि पाणी वाटप केले. त्यानंतर २३ मार्च रोजी देशात ताळेबंदी घोषित करण्यात आली. त्यानुसार दरदिवशी पाचशे लोकांना रात्रीचे जेवण देण्याचे ठरले. ही बाब माझ्या आर्थिक कुवतीच्या बाहेरची होती. ताळेबंदीमुळे माझी फिटनेस अ‍ॅकेडमी ठप्प पडली होती. उत्पन्नाचे स्त्रोत बंद पडले होते. अशा परिस्थितीत हा खर्च उचलायचा कसा, असा प्रश्न भेडसावत होता. मात्र न डगमगता जमेल तेवढे करण्याचा इरादा पक्का केला. आर्थिक मर्यादा झुगारून स्वत:ची पदरमोड करून हे काम अविरत सुरू ठेवले. गोरगरिबांना सर्वच घटकांतून मदतीचा ओघ सुरू झाला. या काळात आम्ही तब्बल २० हजार गरिबांना अन्नदान केले. ही प्रक्रिया सुरू असतानाच मुक्या प्राण्यांचे काय, असा सवाल माझ्या मनाला शिवून केला. दुसऱ्या दिवसांपासून शहरात भटक्या कुत्र्यांना अन्न व पाणी देण्याची मोहीम सुरू केली. ती आजही सुरू आहे. 

- अभय धोंडीराम वाघमारे फिटनेस तज्ज्ञ, नवी मुंबई(संकलन- कमलाकर कांबळे) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या