शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

Coronavirus: कोरोनाने काय शिकवले?; मुक्या प्राण्यांना दिलं अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 00:11 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या वर्षी २२ मार्चपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. लॉकडाऊनपासून प्रत्येक जण घरात अडकला. या काळात कोरोनाने काय शिकवले? कोणता धडा दिला? त्याविषयी हे अनुभव.

पैसा, संपत्ती यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे, हेच सत्य कोरोनामुळे अधोरेखित झाले. कोरोना अजूनही गेलेला नाही. परंतु मागील वर्षभरात जीवनाचे खरे मूल्य कोरोनाने शिकविले. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात ताळेबंदी घोषित करण्यात आली. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. विशेषता हातावर पोट असलेल्या कष्टकरी वर्गाला याची सर्वाधिक झळ बसली. मुक्या प्राण्यांची ससेहोलपट सुरू झाली. बेवारस निराधारांवर उपासमारी ओढावली.  सुरुवातीच्या काही दिवसांतच याचे गांभीर्य माझ्या निदर्शनास आले.

त्यानुसार मी माझ्या मित्राच्या मदतीने योजना तयार केली. संकट मोठे होते. २१ मार्च रोजी दोन अन्य सहकाऱ्यांना सोबत घेऊन पदपथावर उपासमारीचे जीवन जगणाऱ्यांना  खाऊ आणि पाणी वाटप केले. त्यानंतर २३ मार्च रोजी देशात ताळेबंदी घोषित करण्यात आली. त्यानुसार दरदिवशी पाचशे लोकांना रात्रीचे जेवण देण्याचे ठरले. ही बाब माझ्या आर्थिक कुवतीच्या बाहेरची होती. ताळेबंदीमुळे माझी फिटनेस अ‍ॅकेडमी ठप्प पडली होती. उत्पन्नाचे स्त्रोत बंद पडले होते. अशा परिस्थितीत हा खर्च उचलायचा कसा, असा प्रश्न भेडसावत होता. मात्र न डगमगता जमेल तेवढे करण्याचा इरादा पक्का केला. आर्थिक मर्यादा झुगारून स्वत:ची पदरमोड करून हे काम अविरत सुरू ठेवले. गोरगरिबांना सर्वच घटकांतून मदतीचा ओघ सुरू झाला. या काळात आम्ही तब्बल २० हजार गरिबांना अन्नदान केले. ही प्रक्रिया सुरू असतानाच मुक्या प्राण्यांचे काय, असा सवाल माझ्या मनाला शिवून केला. दुसऱ्या दिवसांपासून शहरात भटक्या कुत्र्यांना अन्न व पाणी देण्याची मोहीम सुरू केली. ती आजही सुरू आहे. 

- अभय धोंडीराम वाघमारे फिटनेस तज्ज्ञ, नवी मुंबई(संकलन- कमलाकर कांबळे) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या