शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

Coronavirus: नवी मुंबई, पनवेलमध्ये एक लाख रुग्ण; वर्षभरातील आकडेवारी, २०८४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:48 IST

२२ दिवसांमध्ये आठ हजार रुग्ण वाढले

नामदेव मोरेनवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये वर्षभरामध्ये तब्बल १ लाख ४ हजार ४२२ जणांना कोरोनाची लागण झाली. यामधील ९७,२१२ जणांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागास यश आले आहे. आतापर्यंत २,०८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ५,१२४ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली असून, तीन महानगरांमध्ये मार्च महिन्यातील २२ दिवसांमध्ये तब्बल ८,१२३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्यामुळे प्रादुर्भाव वाढू लागला आहे. नवी मुंबईसह पनवेलमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. कोरोनामुक्त शहर करण्यासाठी दोन्ही महानगरपालिका, उरण नगरपालिका व जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले होते. परंतु फेब्रुवारीमध्ये रेल्वे सुरू झाल्यापासून रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रतिदिन ४०० पेक्षा जास्त रुग्ण वाढू लागले आहेत. पनवेल परिसरात प्रतिदिन ३०० ते ३५० रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची साखळी खंडित करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. कोरोना टाळण्यासाठी मास्कचा वापरा करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा व वारंवार हात धुवा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. परंतु नागरिकांकडून रेल्वे, बस, भाजी मार्केट, बाजार समिती व इतर ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

नवी मुंबई पालिकेने उपचारासाठी सुरू केलेली १२ केंद्रे बंद केली होती. फक्त वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्र सुरू ठेवण्यात आले होते. सिडको प्रदर्शन केंद्रातील रुग्णसंख्याही ३०० पर्यंत खाली आली होती. परंतु सद्य:स्थितीमध्ये तेथे ८३० रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे आता इतर केंद्रेही आवश्यकतेप्रमाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई कडक करण्यात येत आहे.

बाजार समितीमध्ये गर्दीमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला, फळ व धान्य मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मार्केटमधील गर्दी नियंत्रणात आणली नाही, तर बाजार समितीमध्ये व शहरामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कागदावरच उपाययोजनामहानगरपालिकेने कोरोना रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेशही दिले आहेत. परंतु अनेक उपाययोजना फक्त कागदावरच असून प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. यामुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या