शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

Coronavirus: नवी मुंबई, पनवेलमध्ये एक लाख रुग्ण; वर्षभरातील आकडेवारी, २०८४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:48 IST

२२ दिवसांमध्ये आठ हजार रुग्ण वाढले

नामदेव मोरेनवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये वर्षभरामध्ये तब्बल १ लाख ४ हजार ४२२ जणांना कोरोनाची लागण झाली. यामधील ९७,२१२ जणांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागास यश आले आहे. आतापर्यंत २,०८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ५,१२४ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली असून, तीन महानगरांमध्ये मार्च महिन्यातील २२ दिवसांमध्ये तब्बल ८,१२३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्यामुळे प्रादुर्भाव वाढू लागला आहे. नवी मुंबईसह पनवेलमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. कोरोनामुक्त शहर करण्यासाठी दोन्ही महानगरपालिका, उरण नगरपालिका व जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले होते. परंतु फेब्रुवारीमध्ये रेल्वे सुरू झाल्यापासून रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रतिदिन ४०० पेक्षा जास्त रुग्ण वाढू लागले आहेत. पनवेल परिसरात प्रतिदिन ३०० ते ३५० रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची साखळी खंडित करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. कोरोना टाळण्यासाठी मास्कचा वापरा करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा व वारंवार हात धुवा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. परंतु नागरिकांकडून रेल्वे, बस, भाजी मार्केट, बाजार समिती व इतर ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

नवी मुंबई पालिकेने उपचारासाठी सुरू केलेली १२ केंद्रे बंद केली होती. फक्त वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्र सुरू ठेवण्यात आले होते. सिडको प्रदर्शन केंद्रातील रुग्णसंख्याही ३०० पर्यंत खाली आली होती. परंतु सद्य:स्थितीमध्ये तेथे ८३० रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे आता इतर केंद्रेही आवश्यकतेप्रमाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई कडक करण्यात येत आहे.

बाजार समितीमध्ये गर्दीमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला, फळ व धान्य मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मार्केटमधील गर्दी नियंत्रणात आणली नाही, तर बाजार समितीमध्ये व शहरामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कागदावरच उपाययोजनामहानगरपालिकेने कोरोना रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेशही दिले आहेत. परंतु अनेक उपाययोजना फक्त कागदावरच असून प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. यामुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या