शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

CoronaVirus News: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी केले रेल्वेच्या निर्णयाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:49 IST

लॉकडाऊनमध्ये प्रथमच धावली लोकल; शिस्तबद्धरीत्या रेल्वे स्थानकावरील कामकाज

पनवेल : अत्यावश्यक सेवेतील घटकांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून ही सेवा सुरू झाली आहे. लॉकडाऊनमध्ये प्रथमच रेल्वे प्रवास केलेल्या प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले. विशेष म्हणजे प्रथमच अतिशय शिस्तबद्धरीत्या रेल्वे स्थानकावरील कामकाज चालत असल्याचे पाहावयास मिळाले.या अत्यावश्यक सेवेतील घटकांमध्ये पोलीस, बँक कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, पालिका कर्मचारी, माध्यम क्षेत्रातील तसेच अत्यावश्यक सेवेत मोडणाºया नागरिकांना रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जात होता. याकरिता रेल्वे स्थानकावर प्रवेश करण्यापूर्वी सोबत ओळखपत्र बाळगणे अनिवार्य करण्यात आले होते. रेल्वे पोलीस तसेच रेल्वेचे कर्मचारी प्रत्येक प्रवाशाची चौकशी करत होते. तिकीट काढण्यापूर्वीदेखील आपले ओळखपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले होते. पनवेल ते बेलापूर दरम्यान सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांनी सुटलेल्या लोकलने प्रवास केलेले प्रवासी हर्षल पांडव यांनी या निर्णयाचे स्वागत केले. बँक कर्मचारी असल्याने लॉकडाऊनच्या काळात मला रोज प्रवास करावा लागत असे, मात्र आज सुरू झालेल्या रेल्वे सेवेने माझा प्रवास सुखकर झाला. मी बसलेल्या डब्यात अवघे दहा प्रवासी होते. सर्व शिस्तबद्ध पद्धतीने प्रवास करीत होते. रेल्वे स्थानकावर चोख बंदोबस्त होता. केवळ अत्यावश्यक सेवेतील घटकांना स्थानकावर प्रवेश दिला जात होता. हा निर्णय खरोखरच स्वागतार्ह असल्याचे हर्षलने सांगितले.लॉकडाऊनमध्ये प्रथमच धावली लोकल शिस्तबद्धरीत्या रेल्वे स्थानकावरील कामकाजअनेकांना रेल्वेबाबत कल्पना नसल्याने अत्यावश्यक सेवेतील मोजक्याच प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून आले. मंगळवारी ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे. पनवेलवरून सकाळी ४ वाजून ३ मिनिटांनी पहिली लोकल सुटली. शेवटची लोकल रात्री ११ ची होती.अत्यावश्यक सेवेतील घटकांना त्यांचे ओळखपत्र बघून प्रवेश दिला जात होता. या वेळी संबंधित प्रवाशांची थर्मल टेस्टदेखील करण्यात आली. पहिला दिवस असल्याने प्रवाशांची कमी गर्दी आज पाहावयास मिळाली.- एस.एम. नायर, स्टेशन मास्तर, पनवेलट्रान्स हार्बरवर शुकशुकाटचसोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी रेल्वे सुरू करण्यात आल्या. परंतु ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेचा त्यात समावेश नव्हता. यामुळे ठाणे ते वाशी मार्गावरी ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे ही रेल्वे स्थानके ओस पडली होती.नवी मुंबईत जाण्यासाठी पर्यायी वाशी रेल्वे स्थानकातून अनेकांना निश्चित ठिकाणी जावे लागले. तर हार्बर मार्गावर तीन महिन्यांनी पुन्हा एकदा रेल्वे धावल्याने सीबीडी बेलापूर, नेरूळ, सानपाडा तसेच वाशी स्थानकात काही प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या