शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम; तीन लाखांहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 00:19 IST

१० लाख ५३ हजार नागरिकांची तपासणी

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत नवी मुंबई महानगरपालिकेने सुरु वातीपासूनच आघाडी घेत राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या ३ लाख १६ हजार ४४९ कुटुंब सर्वेक्षणाच्या उद्दिष्टापेक्षा जास्त राज्यात सर्वाधिक चांगले काम केलेले आहे. घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये महानगरपालिकेने ३ लाख ३५ हजार ४६९ कुटुंबांमधील १० लाख ५३ हजार ८९६ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ही कामगिरी राज्यात सर्वोत्तम आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पथकात दोन ते तीन कोरोनादूतांचा समावेश असलेली ६७० पथके तयार करण्यात आलेली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन नागरिकांचे शारीरिक तापमान तसेच आॅक्सिजन पातळी तपासून नोंदविण्यासोबतच घरातील एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास अशा प्रकारचा त्रास होत आहे काय? याची माहिती नोंदवित आहेत. तसेच कोणत्या व्यक्तीस मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा अशा सहव्याधी आहेत काय? याबाबतचीही माहिती संकलित केली जात आहे.

यासोबतच घरातील सर्व नागरिकांना कोरोनापासून बचावाची तंत्रे सांगितली जात असून, त्यामध्ये प्रामुख्याने नियमित मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, आजार न लपवता आवश्यकता भासल्यास फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करणे, एखादा कोरोनाबाधित बरा झाला असल्यास इतरांच्या आरोग्य हितासाठी त्यांना प्लाझ्मा डोनेशनसाठी प्रोत्साहित करणे अशी विविध प्रकारची माहिती देत व्यापक स्वरूपात जनजागृती केली जात आहे.मिशन ब्रेक द चेन म्हणजे जलद रुग्णशोधपहिल्या टप्प्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पाही राबविला जाणार असून या पथकांमार्फत पुन्हा सर्व घरांना भेटी देऊन सर्वांचे शारीरिक तापमान आणि आॅक्सिजन सॅच्युरेशन दुसऱ्यांदा मोजले जाणार आहे. तसेच त्या वेळेची आरोग्य स्थिती जाणून घेतली जाणार आहे. या सर्वेक्षणातून संकलित होणाºया माहितीच्या आधारे लक्षणे आढळणाºया नागरिकांना लक्षणांच्या तीव्रतेनुसार लगेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास वेळेत उपचार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.याद्वारे ‘मिशन ब्रेक द चेन’ची त्रिसूत्री म्हणजे जलद रूग्णशोध व त्यांची तपासणी होऊन त्वरित उपचार सुरू झाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मोलाची मदत होत आहे.आयुक्तांचे नागरिकांना आवाहन : नवी मुंबईकर नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेलाही चांगले सहकार्य केले. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक चांगल्या प्रकारची राज्यात सर्वोत्तम कामगिरी आपण करू शकलो त्याबद्दल नवी मुंबईकर नागरिकांचे आभार व्यक्त करीत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या मोहिमेच्या १४ आॅक्टोबरपासून सुरू होणाºया दुसºया टप्प्यातील आरोग्य सर्वेक्षणालाही नागरिकांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तसेच मास्क, सुरक्षित अंतर, सतत हात धुणे या तीन गोष्टींची नियमित सवय लावून आपल्यामुळे आपल्या प्रिय कुटुंबीयांना व इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका