शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

coronavirus: पास मिळण्यास विलंब, अतिरिक्त पैसे मोजूनही जीव धोक्यात; रबाळे, तुर्भे पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 03:36 IST

शासनाने प्रवासाचा मार्ग मोकळा करूनही पास मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे त्यांच्याकडून या धोकादायक प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : परप्रांतीयांकडून कोरोनाच्या भीतीने जादा पैसे मोजून जीव धोक्यात घातला जात आहे. लॉकडाउन लागल्यापासून त्यांची सुरू असलेली ही धडपड अद्यापही थांबलेली नसल्याचे दिसून येत आहे. तर शासनाने प्रवासाचा मार्ग मोकळा करूनही पास मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे त्यांच्याकडून या धोकादायक प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू आहे. तर राज्यासह नवी मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, लॉकडाउन अधिक वाढण्याची शक्यता आहे. गतआठवड्यात शासनाने परराज्यातील व्यक्तींना प्रवासाचा परवाना मिळवून राज्याबाहेर जाण्याची सवलत दिली, यामुळे ज्यांच्याकडे स्वत:ची वाहने आहेत व एकत्रित येऊन भाड्याचे वाहन ठरवले आहे, अशांनी तत्काळ गावचा रस्ता धरला; परंतु ज्यांच्याकडे वाहनांची सोय नाही, असे हजारो परप्रांतीय रेल्वेने गावी जाण्यासाठी प्रवासाच्या पुरवण्याचा अर्ज करून तो मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु एक आठवडा होऊनदेखील बहुतांश व्यक्तींना पास मिळालेला नाही. परिणामी, अशा परप्रांतीयांना गावी सोडण्याचे आमिष दाखवून ट्रक व टेम्पोमधून प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकरिता एका व्यक्तीमागे किमान पाच हजार रुपये आकारले जात आहेत. त्यानुसार ट्रक व टेम्पोमध्ये २५ ते ३० व्यक्तींना कोंबून राज्याबाहेर नेले जात आहे. अशाच दोन ट्रकवर रबाळे एमआयडीसी व तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन्ही पोलीसठाण्यात वाहनचालक व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून वाहने जप्त करण्यात आली आहेत. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी शिळफाटा येथे नाकाबंदीत ट्रक अडवून ही कारवाई केली असता त्यामध्ये ३० प्रवासी आढळून आले. सर्व जण ऐरोली-चिंचपाडा येथील राहणारे आहेत. तर देवीधामनगर येथे ट्रकमध्ये प्रवासी भरले जात असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.प्रतिव्यक्ती तीन ते पाच हजार भाडेरबाळेत पोलिसांना ट्रकमध्ये १२ व्यक्ती आढळून आल्या. सर्व जण उत्तर प्रदेश व इतर ठिकाणी जाणार होते. त्याकरिता प्रतिव्यक्ती तीन ते पाच हजार रुपये भाडे ठरवण्यात आले.कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना गावची ओढ लागली आहे. दोन राज्यांमधील प्रक्रियेमुळे त्यांचे पास मिळण्यास विलंब होत आहे. तर अनेकांना पास मिळेल की नाही, याची खात्री वाटत नसल्याने बेकायदेशीर मार्गाने गाव गाठण्याचा प्रयत्न होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई