शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

coronavirus: पास मिळण्यास विलंब, अतिरिक्त पैसे मोजूनही जीव धोक्यात; रबाळे, तुर्भे पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 03:36 IST

शासनाने प्रवासाचा मार्ग मोकळा करूनही पास मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे त्यांच्याकडून या धोकादायक प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : परप्रांतीयांकडून कोरोनाच्या भीतीने जादा पैसे मोजून जीव धोक्यात घातला जात आहे. लॉकडाउन लागल्यापासून त्यांची सुरू असलेली ही धडपड अद्यापही थांबलेली नसल्याचे दिसून येत आहे. तर शासनाने प्रवासाचा मार्ग मोकळा करूनही पास मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे त्यांच्याकडून या धोकादायक प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू आहे. तर राज्यासह नवी मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, लॉकडाउन अधिक वाढण्याची शक्यता आहे. गतआठवड्यात शासनाने परराज्यातील व्यक्तींना प्रवासाचा परवाना मिळवून राज्याबाहेर जाण्याची सवलत दिली, यामुळे ज्यांच्याकडे स्वत:ची वाहने आहेत व एकत्रित येऊन भाड्याचे वाहन ठरवले आहे, अशांनी तत्काळ गावचा रस्ता धरला; परंतु ज्यांच्याकडे वाहनांची सोय नाही, असे हजारो परप्रांतीय रेल्वेने गावी जाण्यासाठी प्रवासाच्या पुरवण्याचा अर्ज करून तो मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु एक आठवडा होऊनदेखील बहुतांश व्यक्तींना पास मिळालेला नाही. परिणामी, अशा परप्रांतीयांना गावी सोडण्याचे आमिष दाखवून ट्रक व टेम्पोमधून प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकरिता एका व्यक्तीमागे किमान पाच हजार रुपये आकारले जात आहेत. त्यानुसार ट्रक व टेम्पोमध्ये २५ ते ३० व्यक्तींना कोंबून राज्याबाहेर नेले जात आहे. अशाच दोन ट्रकवर रबाळे एमआयडीसी व तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन्ही पोलीसठाण्यात वाहनचालक व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून वाहने जप्त करण्यात आली आहेत. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी शिळफाटा येथे नाकाबंदीत ट्रक अडवून ही कारवाई केली असता त्यामध्ये ३० प्रवासी आढळून आले. सर्व जण ऐरोली-चिंचपाडा येथील राहणारे आहेत. तर देवीधामनगर येथे ट्रकमध्ये प्रवासी भरले जात असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.प्रतिव्यक्ती तीन ते पाच हजार भाडेरबाळेत पोलिसांना ट्रकमध्ये १२ व्यक्ती आढळून आल्या. सर्व जण उत्तर प्रदेश व इतर ठिकाणी जाणार होते. त्याकरिता प्रतिव्यक्ती तीन ते पाच हजार रुपये भाडे ठरवण्यात आले.कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना गावची ओढ लागली आहे. दोन राज्यांमधील प्रक्रियेमुळे त्यांचे पास मिळण्यास विलंब होत आहे. तर अनेकांना पास मिळेल की नाही, याची खात्री वाटत नसल्याने बेकायदेशीर मार्गाने गाव गाठण्याचा प्रयत्न होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई