शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: शहरात कंटेनमेंट झोनचे बॅनर ‘जैसे थे’; नागरिकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:16 IST

नवी मुंबई महापालिका प्रशासनाला विसर

नवी मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळून आलेल्या परिसराला महापालिकेच्या माध्यमातून कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला जातो. नागरिकांच्या माहितीसाठी या परिसरात बॅनरदेखील लावले जातात १४ दिवसांनंतर रुग्णसंख्या कमी झाली असल्यास सदर परिसर कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात येतो. नवी मुंबई शहरातील अनेक परिसरांना कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आले आहे. परंतु बॅनर काढण्याचा विसर महापालिकेला पडला असून यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम पसरलेला आहे.नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुमारे चार हजारांच्या पुढे गेली असून उपचारानंतर सुमारे दोन हजार ३00 व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. मार्च महिन्यापासून शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले होते. १४ दिवसांनंतर या परिसरातील कोरोनाबाधित व्यक्ती बºया झाल्यावर या परिसरांमधील कंटेनमेंट झोन उठविण्यात आले. कंटेनमेंट झोन जाहीर झाल्यावर सदर सोसायटी, इमारतीच्या प्रवेशद्वारावर महापालिकेच्या माध्यमातून बॅनर लावले गेले होते. तसेच रुग्ण आढळलेल्या संबंधित सोसायटीला पत्रदेखील देण्यात येते. रुग्ण बरे झाल्यावर किंवा नव्याने रुग्ण न आढळल्यास १४ दिवसांनंतर या परिसराला कंटेनमेंट झोनमधून वगळले जाते. परंतु त्यानंतर अनेक ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर, बांबू काढण्याचा प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnmmcनवी मुंबई महापालिका