शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Coronavirus: नवी मुंबईत २५ वर्षांनंतर प्रशासकीय राजवट; शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 02:02 IST

सध्या शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना पुन्हा एकदा प्रशासकांची नियुक्ती झाली आहे

नामदेव मोरे 

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे सहावे प्रशासक म्हणून अण्णासाहेब मिसाळ यांनी पदभार स्वीकारला आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या पावणेतीन वर्षांसाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. याच कालावधीमध्ये मनपाच्या विकासाची व आरोग्यसेवेचीही पायाभरणी करण्यात आली होती. २५ वर्षांनंतर पालिकेत पुन्हा एकदा प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असून ते कसे पेलणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे आयुक्त मिसाळ यांनी शुक्रवारपासून प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. १९९२ मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतर आर. सी. सिन्हा यांनी पहिले प्रशासक म्हणून कामकाज पाहिले. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेले नवी मुंबई हे देशातील एकमेव शहर. मूळ गावठाण, सिडको विकसित नोड, एमआयडीसी व नव्याने उभ्या राहणाऱ्या झोपडपट्ट्या असे चित्र शहरात होते. काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा व निधीचाही अभाव होता. अशा परिस्थितीत प्रशासकांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन शहराच्या विकासास सुरुवात केली.

सुरुवातीच्या चार प्रशासकांना फारसा वेळ मिळाला नाही. एम. रमेश कुमार यांची सप्टेंबर १९९२ ला प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. ते मे १९९५ पर्यंत पदावर होते. याच काळात नवी मुंबईमधील आरोग्य रचनेचा पाया घालण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र, माता बाल रुग्णालय व वाशीमध्ये प्रथम संदर्भ रुग्णालय अशी आरोग्य विभागाची रचना करण्याचे निश्चित करण्यात आले. आजही तीच रचना कायम आहे. सुरुवातीला पावणेतीन वर्षांत प्रशासकांनी विकासाचा पाया मजबूत केल्याने पुढील २५ वर्षांत विकासाचे अनेक टप्पे पार करणे शक्य झाले.

सध्या शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना पुन्हा एकदा प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. सर्वाधिकार आयुक्तांकडे एकवटले आहेत. कोरोनाशी लढताना जलद गतीने निर्णय घेणे शक्य होणार आहे. प्रस्ताव तयार करणे, मंजुरी देणे, निविदा मागविणे व निविदांना तत्काळ मंजुरी देणे शक्य होणार आहे.स्थापनेपासूनचे प्रशासक

  • आर. सी. सिन्हा - १ जानेवारी १९९२ ते २ ऑगस्ट १९९२
  • राजीव अग्रवाल - ३ ऑगस्ट १९९२ ते ३१ ऑगस्ट १९९२
  • शंकर मेनन - १ सप्टेंबर १९९२ ते ६ सप्टेंबर १९९२
  • आर. सी. सिन्हा - ७ सप्टेंबर १९९२ ते २७ सप्टेंबर १९९२
  • एम. रमेश कुमार - २८ सप्टेंबर १९९२ ते २० मे १९९५
  • अण्णासाहेब मिसाळ - ८ मे २०२० पासून पुढे

कोरोना तपासणी प्रयोग शाळा हवीचार ते पाच दिवस अहवाल येत नाहीत, यामुळे नवी मुंबईत तपासणी प्रयोग शाळा सुरू करण्यात यावी. २४ तासांच्या आतच तपासणी अहवाल मिळावा. जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी व्हावी व उपचारापासून कोणीही वंचित राहू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली जातआहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या