शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

Coronavirus: नवी मुंबईत २५ वर्षांनंतर प्रशासकीय राजवट; शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 02:02 IST

सध्या शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना पुन्हा एकदा प्रशासकांची नियुक्ती झाली आहे

नामदेव मोरे 

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे सहावे प्रशासक म्हणून अण्णासाहेब मिसाळ यांनी पदभार स्वीकारला आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या पावणेतीन वर्षांसाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. याच कालावधीमध्ये मनपाच्या विकासाची व आरोग्यसेवेचीही पायाभरणी करण्यात आली होती. २५ वर्षांनंतर पालिकेत पुन्हा एकदा प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असून ते कसे पेलणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे आयुक्त मिसाळ यांनी शुक्रवारपासून प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. १९९२ मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतर आर. सी. सिन्हा यांनी पहिले प्रशासक म्हणून कामकाज पाहिले. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेले नवी मुंबई हे देशातील एकमेव शहर. मूळ गावठाण, सिडको विकसित नोड, एमआयडीसी व नव्याने उभ्या राहणाऱ्या झोपडपट्ट्या असे चित्र शहरात होते. काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा व निधीचाही अभाव होता. अशा परिस्थितीत प्रशासकांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन शहराच्या विकासास सुरुवात केली.

सुरुवातीच्या चार प्रशासकांना फारसा वेळ मिळाला नाही. एम. रमेश कुमार यांची सप्टेंबर १९९२ ला प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. ते मे १९९५ पर्यंत पदावर होते. याच काळात नवी मुंबईमधील आरोग्य रचनेचा पाया घालण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र, माता बाल रुग्णालय व वाशीमध्ये प्रथम संदर्भ रुग्णालय अशी आरोग्य विभागाची रचना करण्याचे निश्चित करण्यात आले. आजही तीच रचना कायम आहे. सुरुवातीला पावणेतीन वर्षांत प्रशासकांनी विकासाचा पाया मजबूत केल्याने पुढील २५ वर्षांत विकासाचे अनेक टप्पे पार करणे शक्य झाले.

सध्या शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना पुन्हा एकदा प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. सर्वाधिकार आयुक्तांकडे एकवटले आहेत. कोरोनाशी लढताना जलद गतीने निर्णय घेणे शक्य होणार आहे. प्रस्ताव तयार करणे, मंजुरी देणे, निविदा मागविणे व निविदांना तत्काळ मंजुरी देणे शक्य होणार आहे.स्थापनेपासूनचे प्रशासक

  • आर. सी. सिन्हा - १ जानेवारी १९९२ ते २ ऑगस्ट १९९२
  • राजीव अग्रवाल - ३ ऑगस्ट १९९२ ते ३१ ऑगस्ट १९९२
  • शंकर मेनन - १ सप्टेंबर १९९२ ते ६ सप्टेंबर १९९२
  • आर. सी. सिन्हा - ७ सप्टेंबर १९९२ ते २७ सप्टेंबर १९९२
  • एम. रमेश कुमार - २८ सप्टेंबर १९९२ ते २० मे १९९५
  • अण्णासाहेब मिसाळ - ८ मे २०२० पासून पुढे

कोरोना तपासणी प्रयोग शाळा हवीचार ते पाच दिवस अहवाल येत नाहीत, यामुळे नवी मुंबईत तपासणी प्रयोग शाळा सुरू करण्यात यावी. २४ तासांच्या आतच तपासणी अहवाल मिळावा. जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी व्हावी व उपचारापासून कोणीही वंचित राहू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली जातआहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या