शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

Coronavirus: नवी मुंबईत २५ वर्षांनंतर प्रशासकीय राजवट; शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 02:02 IST

सध्या शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना पुन्हा एकदा प्रशासकांची नियुक्ती झाली आहे

नामदेव मोरे 

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे सहावे प्रशासक म्हणून अण्णासाहेब मिसाळ यांनी पदभार स्वीकारला आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या पावणेतीन वर्षांसाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. याच कालावधीमध्ये मनपाच्या विकासाची व आरोग्यसेवेचीही पायाभरणी करण्यात आली होती. २५ वर्षांनंतर पालिकेत पुन्हा एकदा प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असून ते कसे पेलणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे आयुक्त मिसाळ यांनी शुक्रवारपासून प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. १९९२ मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतर आर. सी. सिन्हा यांनी पहिले प्रशासक म्हणून कामकाज पाहिले. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेले नवी मुंबई हे देशातील एकमेव शहर. मूळ गावठाण, सिडको विकसित नोड, एमआयडीसी व नव्याने उभ्या राहणाऱ्या झोपडपट्ट्या असे चित्र शहरात होते. काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा व निधीचाही अभाव होता. अशा परिस्थितीत प्रशासकांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन शहराच्या विकासास सुरुवात केली.

सुरुवातीच्या चार प्रशासकांना फारसा वेळ मिळाला नाही. एम. रमेश कुमार यांची सप्टेंबर १९९२ ला प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. ते मे १९९५ पर्यंत पदावर होते. याच काळात नवी मुंबईमधील आरोग्य रचनेचा पाया घालण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र, माता बाल रुग्णालय व वाशीमध्ये प्रथम संदर्भ रुग्णालय अशी आरोग्य विभागाची रचना करण्याचे निश्चित करण्यात आले. आजही तीच रचना कायम आहे. सुरुवातीला पावणेतीन वर्षांत प्रशासकांनी विकासाचा पाया मजबूत केल्याने पुढील २५ वर्षांत विकासाचे अनेक टप्पे पार करणे शक्य झाले.

सध्या शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना पुन्हा एकदा प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. सर्वाधिकार आयुक्तांकडे एकवटले आहेत. कोरोनाशी लढताना जलद गतीने निर्णय घेणे शक्य होणार आहे. प्रस्ताव तयार करणे, मंजुरी देणे, निविदा मागविणे व निविदांना तत्काळ मंजुरी देणे शक्य होणार आहे.स्थापनेपासूनचे प्रशासक

  • आर. सी. सिन्हा - १ जानेवारी १९९२ ते २ ऑगस्ट १९९२
  • राजीव अग्रवाल - ३ ऑगस्ट १९९२ ते ३१ ऑगस्ट १९९२
  • शंकर मेनन - १ सप्टेंबर १९९२ ते ६ सप्टेंबर १९९२
  • आर. सी. सिन्हा - ७ सप्टेंबर १९९२ ते २७ सप्टेंबर १९९२
  • एम. रमेश कुमार - २८ सप्टेंबर १९९२ ते २० मे १९९५
  • अण्णासाहेब मिसाळ - ८ मे २०२० पासून पुढे

कोरोना तपासणी प्रयोग शाळा हवीचार ते पाच दिवस अहवाल येत नाहीत, यामुळे नवी मुंबईत तपासणी प्रयोग शाळा सुरू करण्यात यावी. २४ तासांच्या आतच तपासणी अहवाल मिळावा. जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी व्हावी व उपचारापासून कोणीही वंचित राहू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली जातआहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या