शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पनवेल रेल्वेस्थानकावर रिक्षाचालकांमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:41 IST

दोन तास रिक्षा सेवा बंद : प्रवाशांची गैरसोय; वाहतूक आणि पनवेल शहर पोलिसांनी केलीमध्यस्थी

कळंबोली : पनवेल रेल्वेस्थानक परिसरात थांब्यावरून रिक्षाचालकांचा मोठा वाद सुरू आहे. बुधवारी पुन्हा तंटा झाल्याने दोन तास रिक्षा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. वाहतूक आणि पनवेल शहर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, वारंवार होणाऱ्या वादावर कायमस्वरूपी पडदा पडेल केव्हा असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या परिसरात दहा हजारांपेक्षा जास्त रिक्षा व्यवसाय करतात. बऱ्याच ठिकाणी रिक्षांना नाकाबंदी केली जाते म्हणजे इतर रिक्षा त्या ठिकाणी थांबू दिल्या जात नाहीत. हीच परिस्थिती पनवेल रेल्वेस्थानकावर आहे. पनवेल बाजूकडील रिक्षा थांब्यावरून इतरांना प्रवासी नेण्यास मज्जाव केला जातो. त्याचबरोबर येथे स्थानिक आणि बाहेरचा असाही वाद आहे. परंतु एमएमआरडीएच्या क्षेत्रात नियमानुसार कुठेही व्यवसाय करण्याची मुभा असताना येथे आम्हाला थांबू का दिले जात नाही असा प्रश्न दुसरे रिक्षाचालक करीत आहेत. तर येथे व्यवसाय करणारे रिक्षाचालक आम्ही स्थानिक असल्याचा मुद्दा पुढे करीत आहेत. यामुळे पनवेल रेल्वेस्थानकावर वारंवार रिक्षाचालकांमध्ये वादविवाद होतात.

बुधवारी सुद्धा अशाच प्रकारे तंटा झाल्याने दोन गटांत बाचाबाची झाली. त्यामुळे १0 ते १२ या कालावधीत पनवेल रेल्वेस्थानकावरील रिक्षांनी प्रवासी सेवा बंद केली. आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने वादंग मिटत नसल्याचे काही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आणखी एक रिक्षा थांबा सुरू करण्यात आल्याने आतमधील आणि बाहेरवाले असे गट तयार झाले आहेत. एकीकडे रिक्षांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे आणि दुसरीकडे वाद तंटे निर्माण झाल्याने प्रामाणिक रिक्षाचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.एनएमएमटी बसकडे प्रवाशांची धावपनवेल रेल्वे स्थानक परिसरातून एनएमएमटी बस सेवा सुरू आहे. मात्र, प्रवासी शेअर रिक्षांना पसंती देत इच्छित स्थळ गाठतात. बुधवारी रिक्षा बंद असल्याने प्रवाशांनी एनएमएमटी बसमधून प्रवास केला. त्यामुळे बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे पाहावयास मिळाले. 

पनवेल परिसरात बºयाच वेळा रिक्षा थांब्यावरून वाद होतात. तीन महिन्यांपूर्वी रिक्षा चालकांशी समन्वय साधून वाद मिटवण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो ही वस्तुस्थिती आहे. गुरुवारी रेल्वे प्रशासन, रिक्षा चालक, आरटीओ यांची संयुक्त बैठक याबाबत तोडगा काढण्यात येईल.- अभिजित मोहिते,प्रभारी अधिकारी,पनवेल वाहतूक शाखा