शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

पनवेल रेल्वेस्थानकावर रिक्षाचालकांमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:41 IST

दोन तास रिक्षा सेवा बंद : प्रवाशांची गैरसोय; वाहतूक आणि पनवेल शहर पोलिसांनी केलीमध्यस्थी

कळंबोली : पनवेल रेल्वेस्थानक परिसरात थांब्यावरून रिक्षाचालकांचा मोठा वाद सुरू आहे. बुधवारी पुन्हा तंटा झाल्याने दोन तास रिक्षा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. वाहतूक आणि पनवेल शहर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, वारंवार होणाऱ्या वादावर कायमस्वरूपी पडदा पडेल केव्हा असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या परिसरात दहा हजारांपेक्षा जास्त रिक्षा व्यवसाय करतात. बऱ्याच ठिकाणी रिक्षांना नाकाबंदी केली जाते म्हणजे इतर रिक्षा त्या ठिकाणी थांबू दिल्या जात नाहीत. हीच परिस्थिती पनवेल रेल्वेस्थानकावर आहे. पनवेल बाजूकडील रिक्षा थांब्यावरून इतरांना प्रवासी नेण्यास मज्जाव केला जातो. त्याचबरोबर येथे स्थानिक आणि बाहेरचा असाही वाद आहे. परंतु एमएमआरडीएच्या क्षेत्रात नियमानुसार कुठेही व्यवसाय करण्याची मुभा असताना येथे आम्हाला थांबू का दिले जात नाही असा प्रश्न दुसरे रिक्षाचालक करीत आहेत. तर येथे व्यवसाय करणारे रिक्षाचालक आम्ही स्थानिक असल्याचा मुद्दा पुढे करीत आहेत. यामुळे पनवेल रेल्वेस्थानकावर वारंवार रिक्षाचालकांमध्ये वादविवाद होतात.

बुधवारी सुद्धा अशाच प्रकारे तंटा झाल्याने दोन गटांत बाचाबाची झाली. त्यामुळे १0 ते १२ या कालावधीत पनवेल रेल्वेस्थानकावरील रिक्षांनी प्रवासी सेवा बंद केली. आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने वादंग मिटत नसल्याचे काही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आणखी एक रिक्षा थांबा सुरू करण्यात आल्याने आतमधील आणि बाहेरवाले असे गट तयार झाले आहेत. एकीकडे रिक्षांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे आणि दुसरीकडे वाद तंटे निर्माण झाल्याने प्रामाणिक रिक्षाचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.एनएमएमटी बसकडे प्रवाशांची धावपनवेल रेल्वे स्थानक परिसरातून एनएमएमटी बस सेवा सुरू आहे. मात्र, प्रवासी शेअर रिक्षांना पसंती देत इच्छित स्थळ गाठतात. बुधवारी रिक्षा बंद असल्याने प्रवाशांनी एनएमएमटी बसमधून प्रवास केला. त्यामुळे बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे पाहावयास मिळाले. 

पनवेल परिसरात बºयाच वेळा रिक्षा थांब्यावरून वाद होतात. तीन महिन्यांपूर्वी रिक्षा चालकांशी समन्वय साधून वाद मिटवण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो ही वस्तुस्थिती आहे. गुरुवारी रेल्वे प्रशासन, रिक्षा चालक, आरटीओ यांची संयुक्त बैठक याबाबत तोडगा काढण्यात येईल.- अभिजित मोहिते,प्रभारी अधिकारी,पनवेल वाहतूक शाखा