शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

डेंग्यू, मलेरिया साथ नियंत्रणात

By admin | Updated: November 18, 2015 01:21 IST

शहरात सुरू झालेली डेंग्यू व मलेरियाची साथ नियंत्रणामध्ये येवू लागली आहे. पालिकेने आॅगस्टपासून तब्बल ३ लाख ३४ हजार घरांना भेट देवून ५ लाख डासउत्पत्ती स्थळे शोधून

नवी मुंबई : शहरात सुरू झालेली डेंग्यू व मलेरियाची साथ नियंत्रणामध्ये येवू लागली आहे. पालिकेने आॅगस्टपासून तब्बल ३ लाख ३४ हजार घरांना भेट देवून ५ लाख डासउत्पत्ती स्थळे शोधून काढली आहेत. जानेवारीपासून तब्बल १ लाख ४२ हजार रूग्णांची रक्ततपासणी केली आहे. व्यापक जनजागृती मोहीम व केलेल्या उपाययोजनांमुळे शहरातील तापाची साथ नियंत्रणात येवून शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू व मलेरियाची प्रचंड साथ सुरू झाली होती. तापाच्या साथीमुळे शहरातील सर्व रूग्णालये फुल्ल झाली होती. तापामुळे २५ पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाविषयीही नाराजी निर्माण झाली होती. पालिकेने विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती. पालिकेने एप्रिल व मे महिन्यामध्ये शहरातील २ लाख ८६ हजार घरांची पाहणी केली होती. आॅगस्टमध्ये पुन्हा ३ लाख ३४ हजार घरांची पाहणी करून ५ लाख २८ हजार डासउत्पत्तीस्थळे शोधून काढली होती. यामधील ३४८ ठिकाणी एनफिलीस, १०३८ ठिकाणी एडीस व २२ क्युलेक्स डासांच्या अळ्या सापडल्या होत्या. डेंग्यू व मलेरियाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्यामुळे पालिका प्रशासनाने जून महिन्यापासून शहरात २ लाख भित्तीपत्रके गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लावली आहेत. १ लाख ७५ हजार हस्तपत्रकांचे वाटप केले आहे. शहरात तब्बल ९२ शिबिरे व प्रदर्शनांचे आयोजन केले होते. शहरात १३५ मोठे होर्डिंग उभारण्यात आले. प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचता यावे यासाठी १० हजार थ्री फोल्ड बुकलेट, २० हजार स्टीकर्स वाटण्यात आली. महापालिका प्रशासनाने साथ नियंत्रणात आणण्यासाठी लिंक वर्कर व अंगणवाडी सेविकांच्या ५२ प्रशिक्षण सभा घेतल्या होत्या. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या, सामाजिक संस्थांच्या २२० सभा घेवून जनजागृती करण्यात आली. शहरात ६८१४ ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे आहेत. ८५० ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रामध्ये जानेवारीपासून तापाचे १ लाख ४२ हजार रूग्ण आढळून आले आहेत. यामधील १००६ संशयित डेंग्यूचे रूग्ण आहेत. एनएस१ चे ८५९, एलजीएमचे ७३ रूग्ण आढळून आले आहेत. महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांनीही शहरात तापाची साथ नियंत्रणात आली असल्याचे स्पष्ट केले आहे.