शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराची निष्काळजी अपघातग्रस्तांना भोवतेय

By admin | Updated: March 23, 2016 02:28 IST

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये नेरूळमधील दोघांचा मृत्यू झाला, चार जण गंभीर जखमी झाले

नामदेव मोरे,  नवी मुंबईमुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये नेरूळमधील दोघांचा मृत्यू झाला, चार जण गंभीर जखमी झाले. वेळेत रूग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने उपचारापूर्वीच तरूणांचा मृत्यू झाला. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. देशातील सर्वाधिक अपघात होणाऱ्या महामार्गामध्ये मुंबई - पुणे रोडचा समावेश होतो. याच मार्गावर अभिनेते आनंद अभ्यंकर व अक्षय पेंडसे यांचा मृत्यू झाला होता. मुंबईकडे येत असताना टायर फुटल्याने कार दुभाजक ओलांडून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर गेली. तेथे ट्रकच्या धडकेमुळे दोन्ही अभिनेत्यांचा मृत्यू झाला. नेरूळमधील भीमाशंकर सोसायटीतील नगरसेवक रवींद्र इथापे यांचा मुलगा राहुल इथापे व त्याचे मित्र लग्नासाठी सांगलीला गेले होते. तेथून परत येत असताना भाताण बोगद्याजवळ कारचा टायर फुटला. दुभाजक पुरेशा उंचीचा नसल्याने कार पुणे बाजूच्या लेनवर गेल्याने इनोव्हाची जोरदार धडक बसली. यामध्ये प्रशांत पाटील व निखील सुद या दोघांचा मृत्यू झाला. राहुल इथापे, अमर वाणी, प्रतीक धुमाळ, सचिन चव्हाण, भीमा खराडे हे गंभीर जखमी झाले. यामधील खराडे याचेही निधन झाले आहे. अपघात झाल्यानंतर काही मिनिटामध्येच महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर घटनास्थळी पोहचले. त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने रूग्णवाहिका बोलावली. परंतु इथापे यांच्या कारमधील सहाही जणांना गंभीर दुखापत झाली होती. इनोव्हा कारमधील दोन जण जखमी झाले होते. जवळपास अर्धा तासाने एक रूग्णवाहिका आली. त्यामध्ये दोघांना पाठविण्यात आले. यानंतर उर्वरित दोन रूग्णवाहिका येण्यास प्रत्येकी १५ मिनिटे व अर्धा तास वेळ गेला. यामुळे रूग्णालयात जाण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.मुंबई - पुणे महामार्गावर अपघात झाल्यास तत्काळ रूग्णवाहिका पुरविण्याची जबाबदारी टोल वसुली करणाऱ्या ठेकेदाराची आहे. परंतु याठिकाणी जखमींना तत्काळ रूग्णालयात घेवून जाण्याची यंत्रणाच उपलब्ध नाही. वास्तविक महामार्गावरील अपघात हे गंभीर स्वरूपाचे असतात. जखमींना रूग्णालयात घेवून जाण्यासाठी अत्याधुनिक रूग्णवाहिकेची गरज आहे. रूग्णवाहिकेमध्ये तत्काळ उपचार सुरू करण्यासाठी डॉक्टर असणे आवश्यक आहे. परंतु सोमवारी झालेल्या अपघातामध्ये कोणत्याही सुविधा नसलेल्या रूग्णवाहिकेमधूनच रूग्णांना कळंबोली एमजीएम रूग्णालयात आणावे लागले. रूग्णवाहिकेमध्ये चालकाला सहकार्य करण्यासाठी दुसरा कर्मचारीही नव्हता. यामुळे चालकाची धावपळ झाली. वास्तविक महामार्गावर अपघात झाल्यानंतर नेहमीच अशाप्रकारचा अनुभव येत आहे. अनेक रूग्णांना फक्त वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागत आहे.