शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

अकरावीच्या दुसऱ्या यादीतील प्रवेशाला मुदतवाढ, तिसरी यादीही पुढे ढकलली

By admin | Updated: July 8, 2016 20:00 IST

अकरावी आॅनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ८ : अकरावी आॅनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना शनिवारीही महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. दरम्यान, या मुदतवाढीमुळे अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारऐवजी मंगळवारी जाहीर होणार आहे.

सहाय्यक शिक्षण संचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले की, अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी, ४ जुलैला जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवार, गुरूवार आणि शुक्रवारी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यास वेळ दिलेला होता. तर बुधवारी रमजान ईदनिमित्त महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. मात्र काही महाविद्यालयांत दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारनिमित्त सुट्ट्या देण्यात आल्या.

परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस कमी मिळाला होता. याची दखल घेत, उपसंचालक कार्यालयाने प्रवेशासाठी शनिवारी एक दिवस वाढीव दिलेला आहे. दुसऱ्या यादीत ५९ हजार ५०७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यांपैकी शुक्रवारी सायंकाळपर्यंत २७ हजार ३१० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतले होते. त्यामुळे अकरावीला आत्तापर्यंत एकूण १लाख २१ हजार १०१ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केले आहेत. याशिवाय १५ हजार ६५२ विद्यार्थी तिसऱ्या यादीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र प्रवेश घेतलेल्या आणि प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता मुंबई महानगर क्षेत्रातील हजारो जागा रिक्त राहण्याची भीती आहे.