शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

पावसामुळे भाजीपाला, फळांकडे ग्राहकांनी फिरविली पाठ; APMC बाजारात बराच भाजीपाला सडला...

By नामदेव मोरे | Updated: August 20, 2025 12:25 IST

भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची ओढवली नामुष्की

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मुसळधार पावसाचा फटका कृषी व्यापारासही बसला आहे. मंगळवारी भाजीपाला, फळ मार्केटकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. यामुळे जवळपास २५ टक्के भाजीपाल्याची विक्रीच झाली नाही. भिजल्यामुळे ५० टनपेक्षा जास्त मालाचे नुकसान झाले आहे. ग्राहक नसल्यामुळे बाजारभावही घसरले असून, किरकोळ मार्केटमध्येही दर नियंत्रणात आले आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी ४९० ट्रक  टेम्पोमधून १७९२ टन  भाजीपाला विक्रीसाठी आला होता. तीन दिवसांपासून मंदी असल्यामुळे आवकही कमी झाली. गरजेपेक्षा कमी आवक होऊनही जवळपास ४५० ते  ५०० टन भाजीपाल्याची विक्री झाली नाही. भिजल्यामुळे कोथिंबीर, टोमॅटोसह इतर पालेभाज्या सडण्याचे प्रमाण वाढले आहे. 

धान्य मार्केटवरही परिणाम

फळमार्केटमध्येही ग्राहकांनी पाठ फिरविली होती; परंतु या ठिकाणी भाजीपाल्याच्या तुलनेमध्ये माल जास्त खराब झाला नाही. कांदा, बटाटा, धान्य व मसाला मार्केटमध्येही ग्राहकांचे प्रमाण कमी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

कांदा, बटाटा, लसूण मार्केटमध्ये ग्राहकांची संख्या कमी होती. दिगंबर राऊत, कांदा व्यापारीभाजीपाला मार्केटमध्ये आवक कमी झाली होती; परंतु ग्राहकच नसल्यामुळे माल शिल्लक राहिला आहे. शंकर पिंगळे, संचालक, भाजीमार्केट फळमार्केटमध्ये २५ टक्केही व्यापार झाला नाही. मुंबईतील पावसाचा परिणाम विक्रीवर झाला आहे. संजय पानसरे, संचालक, फळमार्केट

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई