शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

निलंबनाविरोधात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2015 23:41 IST

काँग्रेसच्या २५ खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने कोकण भवन कार्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली

नवी मुंबई : काँग्रेसच्या २५ खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने कोकण भवन कार्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारची हुकूमशाही थांबवून २५ खासदारांचे निलंबन मागे घ्यावे, तसेच भ्रष्टाचारी मंत्र्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना सोमवारी ३ आॅगस्ट रोजी पाच दिवसांकरिता निलंबित केले. हे अत्यंत निषेधार्ह आहे. त्याविरुध्द तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे मत जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश नायडू यांनी व्यक्त केली. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कोकण विभागाच्या प्रशासन विभागाचे उपआयुक्त राजीव द. निवतकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनातील मागण्यांच्या अनुषंगाने हा अहवाल राज्य व केंद्र शासनाला पाठविला जाईल, असे आश्वासन निवतकर यांनी दिले. यावेळी ठाणे लोकसभा युवा काँग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत, काँग्रेसचे सचिव विलासराव यादव, संतोष कांबळे, जिल्हा कॉँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.