शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

वाशी स्थानकात काँगे्रसची निदर्शने

By admin | Updated: August 26, 2015 22:40 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने निवडणूक काळात नागरिकांवर आश्वासनांचा वर्षाव केला होता. परंतु प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्तता केली नसल्यामुळे काँगे्रसने आंदोलन

नवी मुंबई : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने निवडणूक काळात नागरिकांवर आश्वासनांचा वर्षाव केला होता. परंतु प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्तता केली नसल्यामुळे काँगे्रसने आंदोलन सुरू केले आहे. वाशी रेल्वे स्टेशनसमोर निदर्शने करून सरकारने जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप केला आहे. वाशी रेल्वे स्टेशनसमोर काँगे्रस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. माजी मंत्री नसीम खान यांनी सरकारवर टीका केली. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहे. राज्यात सरकारचे विविध घोटाळे समोर येत आहेत. अच्छे दिन आऐंगे, असे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु प्रत्यक्षात जनतेची दिशाभूल झाली आहे. महागाईमुळे जगणे अशक्य झाल्याची टीकाही त्यांनी केली. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, उपमहापौर अविनाश लाड यांनीही सरकारच्या कारभारावर टीका केली. कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे चांगले पैसे येत नाहीत व ग्राहकांना स्वस्त वस्तू मिळत नसल्याची टीकाही यावेळी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा नीला लिमये, रमाकांत म्हात्रे, अनिल कौशिक, संतोष शेट्टी, सुधीर पवार, अंजली वाळुंज, वैजयंती भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते.