शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

डॉक्टरांविना रुग्णांचे हाल

By admin | Updated: November 17, 2016 05:32 IST

वेळेवर वैद्यकीय उपचार होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो.

गिरीश गोरेगावकर

माणगाव : येथील उपजिल्हा रुग्णालय शेवटची घटका मोजत असून रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.गौतम देसाई हे सर्व पातळीवर एकाकी झुंज देत असल्याने रुग्णांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. वेळेवर वैद्यकीय उपचार होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो.माणगाव मुंबई-गोवा महामार्गावरील जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून याठिकाणी गरीब रुग्णांना व अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा तातडीने मिळणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत माणगावचे पहिले आमदार द. मा. तळेगावकर यांनी संघर्ष करून पेण येथे होणारे रुग्णालय माणगावला आणले. रुग्णालयाचा वाढता पसारा लक्षात घेता तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी इमारतीचे नूतनीकरण करून त्यामध्ये विविध विभागांची निर्मिती करीत आवश्यक पदे निर्माण केली. उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचे आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. माणगावसारख्या महत्त्वाच्या व सोयीस्कर असलेल्या या रु ग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर व तांत्रिक कर्मचारी हजर झाल्यास अनेकांना दिलासा मिळू शकतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयामध्ये डॉ.गौतम देसाई वगळता एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने रु ग्णालयाचीच हालत खराब झाली आहे. माणगाव शहरात सुमारे ३० ते ३५ खाजगी दवाखाने आहेत. सरकारी रुग्णालयात डॉक्टर नसल्याने तेथे रुग्णांची खाजगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या खाजगी रुग्णालयात खेड, पोलादपूर, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, दापोली व इतर शहरातील रुग्ण दररोज उपचाराकरिता दाखल होत असतात. त्यामुळे या रुग्णालयासाठी कोणत्याही सोयी-सुविधा व उपाययोजना न केल्याने रुग्णांना नाइलाजाने वारेमाप खर्च करून खाजगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागत आहे. आ.सुनील तटकरे हे पालकमंत्री असताना माजी आमदार अशोक साबळे यांच्यासमवेत मंत्रालय मुंबई येथील आरोग्य मंत्र्यांच्या दालनात अनेक वेळा बैठका झाल्या, मात्र तरीही डॉक्टर अद्यापही हजर झालेले नाहीत. तांत्रिक साहित्य व उपकरणे तशीच कर्मचाऱ्यांविना धूळ खात पडली आहेत. लाखो रुपयांचे सिटीस्कॅन मशीन व इतर तांत्रिक उपकरणे कर्मचारी नसल्याने बंद अवस्थेत आहे.