शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-बेलापूर रोडवरील अतिक्रमण हटवून काँक्रीटीकरण मार्गी

By admin | Updated: July 9, 2016 03:37 IST

दिघा येथे अतिक्रमणामुळे आठ वर्षे ठाणे-बेलापूर रोडचे रूंदीकरण रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर आठ दिवसांत अतिक्रमण हटवून काँक्रीटीकरणाचे काम

नवी मुंबई : दिघा येथे अतिक्रमणामुळे आठ वर्षे ठाणे-बेलापूर रोडचे रूंदीकरण रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर आठ दिवसांत अतिक्रमण हटवून काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. दोन मार्गिका वाहतुकीसाठी तत्काळ खुल्या करण्यात आल्या असून येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे. सायन - पनवेल महामार्गानंतर नवी मुंबईमध्ये सर्वाधिक वाहतूक ठाणे- बेलापूर रोडवरून होते. ठाणे व मनपा क्षेत्रातील औद्योगिक वसाहती व जवळील जेएनपीटी बंदर यामुळे या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. रोडवर प्रत्येक वर्षी खड्डे पडत असल्याने पालिकेने या रोडचे काँक्रीटीकरण केले आहे. तुर्भे एस. के. व्हील ते ठाणे मनपाच्या हद्दीपर्यंत रोडचे रूंदीकरण केले. परंतु दिघा गावाजवळ रोडवर असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे तब्बल आठ वर्षे रूंदीकरणाचे काम रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिघा विभाग कार्यालयाचा पाहणी दौरा करताना त्यांच्या हा प्रश्न निदर्शनास आला. अतिक्रमण आठ दिवसांमध्ये हटविण्याचा आदेश त्यांनी प्रशासनाला दिला. या भूमिकेमुळे बांधकामधारकांनी स्वत:च अतिक्रमण जमीनदोस्त केले. ८ वर्षांपासून रखडलेला प्रश्न चक्क ८ दिवसांमध्ये सुटला. अतिक्रमण हटविल्यानंतर तत्काळ रूंदीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. युद्धपातळीवर काम करून या मार्गावरील दोन लेन ३ जुलैला वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. उर्वरित लेनचे कामही प्रगतिपथावर आहे. आयुक्तांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे व टाईम बाँडमध्ये कामे करण्याच्या धोरणामुळे वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न तत्काळ मार्गी लागला आहे. येथे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. अपघात होवून अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. आता या सर्व समस्या सुटणार आहेत. येथील वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहतूकदार ऐरोली - मुलुंड मार्गाचा अवलंब करत होते. यामुळे ७ ते ८ किलोमीटरचा प्रवास वाढत होता. याशिवाय टोलसाठी ६० ते ७० रूपये खर्च होत होता. आता हा खर्च वाचणार असल्याने वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. शहरवासीयांना चांगल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचे नागरिकांनी स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)