शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

निर्माल्यातून कंपोस्ट खताची निर्मिती

By admin | Updated: September 26, 2015 01:21 IST

सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा धोका संपूर्ण जगाला भेडसावत आहे. निसर्गाला पूरक सण साजरे करण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत

वैभव गायकर , पनवेलसध्या ग्लोबल वॉर्मिंगचा धोका संपूर्ण जगाला भेडसावत आहे. निसर्गाला पूरक सण साजरे करण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगरात साजरा केला जातो. विसर्जनावेळी अनेक जण निर्माल्य पाण्यात विसर्जित करतात. त्यामुळे जलप्रदूषण होतेच तसेच पाण्यामधील जीवसृष्टीला देखील धोका निर्माण होतो. लोकांच्या धार्मिक भावना जोडलेल्या असल्यामुळे जनजागृती करुन देखील ही बाब नागरिकांच्या लक्षात येत नाही. मात्र डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने निर्माल्यातून कंपोस्ट खताची निर्मिती करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. खारघरमध्ये हा प्रयोग राबविला जात असून या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद लाभल्यास संपूर्ण मुंबईभर हा उपक्रम राबविला जाणार आहे. खारघरमध्ये तीन विसर्जित ठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. विसर्जनासाठी आलेल्या मूर्तींना विसर्जित करुन त्याठिकाणचे निर्माल्य एकत्र करण्याचे काम हे स्वयंसेवक करीत आहेत. खारघरमध्ये कोपरा तलाव, मुर्बी तलाव, खारघर गावाजवळील विसर्जन घाटावर हे स्वयंसेवक हे निर्माल्य एकत्र करण्याचे काम करीत आहेत. खारघरमधील दीड दिवसाच्या ९५१ मूर्ती या ४९ स्वयंसेवकांनी विसर्जित केल्या व त्याठिकाणचा एकूण ४ टन निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. तसेच पाच दिवसांच्या १४०९ मूर्तींना ७४ स्वयंसेवकांनी विसर्जित करुन जवळजवळ साडेपाच टन निर्माल्य जमा केले आहे. अशा दोन दिवसांचे साडेनऊ टन निर्माल्य खारघर गावाजवळील अंबिका भवन याठिकाणच्या मोकळ्या जागेत पुरुन त्यावर कंपोस्ट खतासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. खारघर शहरामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने तळोजा मध्यवर्ती कारागृहात एक हजार वृक्षांची लागवड काही महिन्यापूर्वी केली होती. त्यांच्या संवर्धनासाठी हे खत वापरले जाणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे निर्माल्यातून होणारा कचऱ्याची आपोआप विल्हेवाट लागणार असून जलप्रदूषण थांबणार आहे. तसेच यापासून निर्माण होणारे खत शेतीसाठी देखील वापरता येणार आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबविलेल्या या उपक्रमासाठी विसर्जित ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. तसेच दहा दिवसांच्या विसर्जनावेळी देखील मोठ्या संख्येने स्वयंसेवक विसर्जित ठिकाणी उपस्थित राहून निर्माल्य एकत्र करणार आहेत. या उपक्रमाला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद लाभत असून खारघरमधील हा उपक्रम यशस्वी झाल्यास मुंबई उपनगरात देखील अशाप्रकारचा उपक्रम राबविण्यात येईल.