शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
7
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
8
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
9
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
10
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
11
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
12
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
13
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
14
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
15
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
16
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
17
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
18
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
19
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
20
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान

निर्माल्यातून कंपोस्ट खताची निर्मिती

By admin | Updated: September 26, 2015 01:21 IST

सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा धोका संपूर्ण जगाला भेडसावत आहे. निसर्गाला पूरक सण साजरे करण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत

वैभव गायकर , पनवेलसध्या ग्लोबल वॉर्मिंगचा धोका संपूर्ण जगाला भेडसावत आहे. निसर्गाला पूरक सण साजरे करण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगरात साजरा केला जातो. विसर्जनावेळी अनेक जण निर्माल्य पाण्यात विसर्जित करतात. त्यामुळे जलप्रदूषण होतेच तसेच पाण्यामधील जीवसृष्टीला देखील धोका निर्माण होतो. लोकांच्या धार्मिक भावना जोडलेल्या असल्यामुळे जनजागृती करुन देखील ही बाब नागरिकांच्या लक्षात येत नाही. मात्र डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने निर्माल्यातून कंपोस्ट खताची निर्मिती करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. खारघरमध्ये हा प्रयोग राबविला जात असून या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद लाभल्यास संपूर्ण मुंबईभर हा उपक्रम राबविला जाणार आहे. खारघरमध्ये तीन विसर्जित ठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. विसर्जनासाठी आलेल्या मूर्तींना विसर्जित करुन त्याठिकाणचे निर्माल्य एकत्र करण्याचे काम हे स्वयंसेवक करीत आहेत. खारघरमध्ये कोपरा तलाव, मुर्बी तलाव, खारघर गावाजवळील विसर्जन घाटावर हे स्वयंसेवक हे निर्माल्य एकत्र करण्याचे काम करीत आहेत. खारघरमधील दीड दिवसाच्या ९५१ मूर्ती या ४९ स्वयंसेवकांनी विसर्जित केल्या व त्याठिकाणचा एकूण ४ टन निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. तसेच पाच दिवसांच्या १४०९ मूर्तींना ७४ स्वयंसेवकांनी विसर्जित करुन जवळजवळ साडेपाच टन निर्माल्य जमा केले आहे. अशा दोन दिवसांचे साडेनऊ टन निर्माल्य खारघर गावाजवळील अंबिका भवन याठिकाणच्या मोकळ्या जागेत पुरुन त्यावर कंपोस्ट खतासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. खारघर शहरामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने तळोजा मध्यवर्ती कारागृहात एक हजार वृक्षांची लागवड काही महिन्यापूर्वी केली होती. त्यांच्या संवर्धनासाठी हे खत वापरले जाणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे निर्माल्यातून होणारा कचऱ्याची आपोआप विल्हेवाट लागणार असून जलप्रदूषण थांबणार आहे. तसेच यापासून निर्माण होणारे खत शेतीसाठी देखील वापरता येणार आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबविलेल्या या उपक्रमासाठी विसर्जित ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. तसेच दहा दिवसांच्या विसर्जनावेळी देखील मोठ्या संख्येने स्वयंसेवक विसर्जित ठिकाणी उपस्थित राहून निर्माल्य एकत्र करणार आहेत. या उपक्रमाला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद लाभत असून खारघरमधील हा उपक्रम यशस्वी झाल्यास मुंबई उपनगरात देखील अशाप्रकारचा उपक्रम राबविण्यात येईल.