शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

निर्माल्यातून कंपोस्ट खताची निर्मिती

By admin | Updated: September 26, 2015 01:21 IST

सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा धोका संपूर्ण जगाला भेडसावत आहे. निसर्गाला पूरक सण साजरे करण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत

वैभव गायकर , पनवेलसध्या ग्लोबल वॉर्मिंगचा धोका संपूर्ण जगाला भेडसावत आहे. निसर्गाला पूरक सण साजरे करण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगरात साजरा केला जातो. विसर्जनावेळी अनेक जण निर्माल्य पाण्यात विसर्जित करतात. त्यामुळे जलप्रदूषण होतेच तसेच पाण्यामधील जीवसृष्टीला देखील धोका निर्माण होतो. लोकांच्या धार्मिक भावना जोडलेल्या असल्यामुळे जनजागृती करुन देखील ही बाब नागरिकांच्या लक्षात येत नाही. मात्र डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने निर्माल्यातून कंपोस्ट खताची निर्मिती करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. खारघरमध्ये हा प्रयोग राबविला जात असून या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद लाभल्यास संपूर्ण मुंबईभर हा उपक्रम राबविला जाणार आहे. खारघरमध्ये तीन विसर्जित ठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. विसर्जनासाठी आलेल्या मूर्तींना विसर्जित करुन त्याठिकाणचे निर्माल्य एकत्र करण्याचे काम हे स्वयंसेवक करीत आहेत. खारघरमध्ये कोपरा तलाव, मुर्बी तलाव, खारघर गावाजवळील विसर्जन घाटावर हे स्वयंसेवक हे निर्माल्य एकत्र करण्याचे काम करीत आहेत. खारघरमधील दीड दिवसाच्या ९५१ मूर्ती या ४९ स्वयंसेवकांनी विसर्जित केल्या व त्याठिकाणचा एकूण ४ टन निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. तसेच पाच दिवसांच्या १४०९ मूर्तींना ७४ स्वयंसेवकांनी विसर्जित करुन जवळजवळ साडेपाच टन निर्माल्य जमा केले आहे. अशा दोन दिवसांचे साडेनऊ टन निर्माल्य खारघर गावाजवळील अंबिका भवन याठिकाणच्या मोकळ्या जागेत पुरुन त्यावर कंपोस्ट खतासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. खारघर शहरामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने तळोजा मध्यवर्ती कारागृहात एक हजार वृक्षांची लागवड काही महिन्यापूर्वी केली होती. त्यांच्या संवर्धनासाठी हे खत वापरले जाणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे निर्माल्यातून होणारा कचऱ्याची आपोआप विल्हेवाट लागणार असून जलप्रदूषण थांबणार आहे. तसेच यापासून निर्माण होणारे खत शेतीसाठी देखील वापरता येणार आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबविलेल्या या उपक्रमासाठी विसर्जित ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. तसेच दहा दिवसांच्या विसर्जनावेळी देखील मोठ्या संख्येने स्वयंसेवक विसर्जित ठिकाणी उपस्थित राहून निर्माल्य एकत्र करणार आहेत. या उपक्रमाला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद लाभत असून खारघरमधील हा उपक्रम यशस्वी झाल्यास मुंबई उपनगरात देखील अशाप्रकारचा उपक्रम राबविण्यात येईल.