शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पावसाळापूर्व कामे २५ मे आधी पूर्ण करा

By admin | Updated: May 13, 2017 01:18 IST

कोणतीही आपत्ती पूर्वसूचना देवून येत नाही. यामुळे पावसाळापूर्व सर्व कामे २५ मेपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. आवश्यक ती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोणतीही आपत्ती पूर्वसूचना देवून येत नाही. यामुळे पावसाळापूर्व सर्व कामे २५ मेपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिल्या आहेत. शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक शुक्रवारी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आपत्ती विभागाचे प्रमुख अंकुश चव्हाण यांनी आतापर्यंत केलेली कामे व यापुढे करण्यात येणारी कामे याविषयी माहिती दिली. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेवून पाणी साचण्याची ठिकाणे व दरड कोसळण्याची संभाव्य ठिकाणे यांची पाहणी करून संबंधितांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. होल्डिंग पाँडच्या फ्लॅपगेटची दुरुस्ती करण्यात आली आहे. महापालिका मुख्यालयामध्ये मध्यवर्ती आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली येथील अग्निशमन केंद्राच्या ठिकाणी पावसाळी कालावधीत १जूनपासून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. सर्व विभाग कार्यालयांमध्ये २५ मेपासून आपत्कालीन कक्ष सुरू केला जाणार आहे. पालिका आयुक्त रामास्वामी यांनी नालेसफाईची सर्व कामे २५ मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रस्त्यांवरील खोदकाम तत्काळ बंद करण्यात यावे. खोदलेले चर भरण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत. पावसाळी कालावधीमध्ये नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहचविण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. आपत्तीमध्ये कमीत कती वेळेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत संदेश पोहचविण्यासाठी मोबाइल कंपन्यांची मदत घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये स्वयंसेवी संस्था, मंडळे, पोहणाऱ्या व्यक्ती, विविध प्रकारच्या मदतकार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचे संपर्कध्वनी एकत्रित करून त्याची सूची अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खदाण क्षेत्रामध्ये बुडून मृत्यू होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी धोक्याच्या सूचना देण्यात याव्यात. विद्युत बॉक्सची सर्व झाकणे बसविण्यात यावीत अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. पावसाळ्यात सर्वांमध्ये समन्वय आणि सुसंवाद महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे.तत्काळ मदतीसाठी तत्पर असावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, रमेश चव्हाण, अमरिश पटनिगिरे, दादासाहेब चाबुकस्वार, तुषार पवार, शिरीष आरदवाड, रेल्वेचे आर. के. देवांद, एमटीएनएलचे राजाराम, सिडकोचे नितीन देशपांडे, सहायक पोलीस आयुक्त पी. जी. माने, अनिल शिंदे, कोस्टल गार्डचे प्रवीण कुमार, आरटीओचे सचिन पाटील, एमआयडीसीचे प्रकाश चव्हाण, एस.पी. आव्हाड, महावितरणचे पी. डी. अन्नछत्रे, ठाणे बेलापूर इंडस्ट्रीयल असोसिएशनचे एम. एम. ब्रम्हे, एपीएमसीचे एस. एम. मोहाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.