शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
2
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
3
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
4
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
5
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
6
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
7
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
8
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
9
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
10
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
11
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
12
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
13
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
14
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
15
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
16
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
17
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
18
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
19
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
20
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले

पावसाळापूर्व कामे २५ मे आधी पूर्ण करा

By admin | Updated: May 13, 2017 01:18 IST

कोणतीही आपत्ती पूर्वसूचना देवून येत नाही. यामुळे पावसाळापूर्व सर्व कामे २५ मेपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. आवश्यक ती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोणतीही आपत्ती पूर्वसूचना देवून येत नाही. यामुळे पावसाळापूर्व सर्व कामे २५ मेपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिल्या आहेत. शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक शुक्रवारी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आपत्ती विभागाचे प्रमुख अंकुश चव्हाण यांनी आतापर्यंत केलेली कामे व यापुढे करण्यात येणारी कामे याविषयी माहिती दिली. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेवून पाणी साचण्याची ठिकाणे व दरड कोसळण्याची संभाव्य ठिकाणे यांची पाहणी करून संबंधितांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. होल्डिंग पाँडच्या फ्लॅपगेटची दुरुस्ती करण्यात आली आहे. महापालिका मुख्यालयामध्ये मध्यवर्ती आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली येथील अग्निशमन केंद्राच्या ठिकाणी पावसाळी कालावधीत १जूनपासून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. सर्व विभाग कार्यालयांमध्ये २५ मेपासून आपत्कालीन कक्ष सुरू केला जाणार आहे. पालिका आयुक्त रामास्वामी यांनी नालेसफाईची सर्व कामे २५ मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रस्त्यांवरील खोदकाम तत्काळ बंद करण्यात यावे. खोदलेले चर भरण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत. पावसाळी कालावधीमध्ये नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहचविण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. आपत्तीमध्ये कमीत कती वेळेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत संदेश पोहचविण्यासाठी मोबाइल कंपन्यांची मदत घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये स्वयंसेवी संस्था, मंडळे, पोहणाऱ्या व्यक्ती, विविध प्रकारच्या मदतकार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचे संपर्कध्वनी एकत्रित करून त्याची सूची अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खदाण क्षेत्रामध्ये बुडून मृत्यू होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी धोक्याच्या सूचना देण्यात याव्यात. विद्युत बॉक्सची सर्व झाकणे बसविण्यात यावीत अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. पावसाळ्यात सर्वांमध्ये समन्वय आणि सुसंवाद महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे.तत्काळ मदतीसाठी तत्पर असावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, रमेश चव्हाण, अमरिश पटनिगिरे, दादासाहेब चाबुकस्वार, तुषार पवार, शिरीष आरदवाड, रेल्वेचे आर. के. देवांद, एमटीएनएलचे राजाराम, सिडकोचे नितीन देशपांडे, सहायक पोलीस आयुक्त पी. जी. माने, अनिल शिंदे, कोस्टल गार्डचे प्रवीण कुमार, आरटीओचे सचिन पाटील, एमआयडीसीचे प्रकाश चव्हाण, एस.पी. आव्हाड, महावितरणचे पी. डी. अन्नछत्रे, ठाणे बेलापूर इंडस्ट्रीयल असोसिएशनचे एम. एम. ब्रम्हे, एपीएमसीचे एस. एम. मोहाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.