शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

बंधाऱ्यांची ३५१ कामे पूर्ण

By admin | Updated: October 29, 2015 23:39 IST

संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’स रायगड जिल्ह्यात यश येत असल्याचे दिसून येत आहे. २६ जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत राबविण्यात येत

जयंत धुळप,  अलिबागसंपूर्ण राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’स रायगड जिल्ह्यात यश येत असल्याचे दिसून येत आहे. २६ जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत, रायगड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४५ गावांची निवड करण्यात आली असून त्यात एकूण १ हजार ३४२ बंधाऱ्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी सप्टेंबर अखेर ३५१ कामे पूर्ण झाली असून १४ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यावर आतापर्यंत ७ कोटी ३८ लाख ९० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.जिल्ह्यात पूर्ण झालेल्या ३५१ बंधाऱ्यांच्या माध्यमातून पावसाचे वाहून जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात अडवण्यात आणि जमिनीत जिरवण्यात यश आले आहे. या जलयुक्त बंधाऱ्यांमुळे त्या आसपासच्या विहिरींच्या जलपातळीत यंदा वाढ दिसून आली तर बंधाऱ्यांतील पाण्याचा उपयोग भातशेतीस झाल्याचे निष्कर्ष कृषी विभागाचे आहेत. जिल्ह्यातील एकूण १ हजार ३४२ बंधाऱ्यांच्या कामांसाठी ४२ कोटी ४८ लाख४९ हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे. शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात २९ कोटी ५४ लाख ८७ हजार रुपये तर जिल्ह्यातील विविध कारखाने व उद्योगांच्या सामाजिक बांधिलकी निधीतून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मुंबईतील श्रीसिध्दिविनायक न्यासाने रायगड जिल्ह्यास एक कोटी रुपयांचा निधी दिला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्व कामे पूर्ण करण्याकरिता आणखी १० कोटी ९३ लाख ६२ हजार रु पये निधीची आवश्यकता आहे.