शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

पालिकेची आरोग्य व्यवस्था कोमात

By admin | Updated: August 5, 2015 00:18 IST

डेंग्यू, मलेरिया व तापाच्या साथीने नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खासगी रुग्णालयांमध्येही जादा बेड

नवी मुंबई : डेंग्यू, मलेरिया व तापाच्या साथीने नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खासगी रुग्णालयांमध्येही जादा बेड टाकण्याची वेळ आली आहे. बहुतांश रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग फुल्ल असून रुग्णांना उपचारांसाठी मुंबईत जावे लागत आहे. नवी मुंबई महानगरपालिका दरवर्षी आरोग्यव्यवस्था व घनकचरा व्यवस्थापनावर १५० कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करत आहे. परंतु तरीही आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. नेरूळ व तुर्भेमधील माताबाल रुग्णालय बंद झाले आहे. ऐरोलीतील रुग्णालय नावापुरतेच आहे. कोपरखैरणेमधील रुग्णालयाची वास्तूही धोकादायक झाली आहे. शहराची लोकसंख्या १२ लाखांपेक्षा जास्त असून पालिकेचे एकमेव प्रथम संदर्भ रुग्णालय शिल्लक आहे. तिथे फक्त ३०० बेड आहेत. शहरात डेंग्यू, मलेरिया व तापाची साथ पसरली आहे. प्रत्येक रुग्णालयामध्ये रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रोज १५०० ते १८०० रुग्ण येत आहेत. रुग्णालयामधील अतिदक्षता विभाग, ट्रॉमा सेंटर फुल्ल झाले आहे. जागा नसल्यामुळे रुग्णांना परत पाठवावे लागत आहे. सोमवारी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. सोनोग्राफी व एक्स-रे विभागांत प्रचंड गर्दी झाली होती. अनेक रुग्णांना परत पाठवावे लागले. शहरात जवळपास ६१ रुग्णालये आहेत. अतिदक्षता विभागाची सोय असलेल्या बहुतेक ठिकाणी जागा फुल्ल झाली आहे. ज्या ठिकाणी सुविधा आहे तेथेही रुग्णांना दाखल करण्यापूर्वी २० ते ४० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागत आहे. अपघात व इतर आजारांमध्ये ज्यांना अतिदक्षता विभागात ठेवणे आवश्यक आहे, त्यांना सायन, जे. जे. व इतर रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये जागा मिळाली तरी बिल सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. रुग्णवाहिकाही कमी खर्चात मिळत नाही. गरीब रुग्णांचा जीव जात असताना प्रशासन शांत बसले आहे.नवी मुंबईची लोकसंख्या १२ लाखांपेक्षा जास्त झाली असून त्यांच्यासाठी महापालिकेचे वाशीमध्ये ३०० बेडचे एकच रुग्णालय आहे. तुर्भेतील माताबाल रुग्णालय बंद झाले आहे. नेरुळचे रुग्णालयही बंदच आहे. ऐरोली रुग्णालय फक्त नावापुरते सुरू असून कोपरखैरणेतील इमारतही धोकादायक बनली असून त्या रुग्णालयाचाही पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. एका रुग्णालयावर ताण पडत असून गरीब रुग्णांना उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे.