शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

शेतकरी संपाचा फटका

By admin | Updated: June 3, 2017 06:31 IST

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, तसेच इतर न्यायपूर्ण मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले आहेत. त्यामुळे भाजीपाल्यासमवेतच

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/ मुरु ड : शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, तसेच इतर न्यायपूर्ण मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले आहेत. त्यामुळे भाजीपाल्यासमवेतच दुधाचेही ट्रक अडविल्यामुळे शुक्रवारी मुरु डकरांना दुधाची चणचण भासली. सातारा, कोल्हापूर, सांगली या परिसरातून वेगवेगळ्या कंपन्यांचे दूध रायगड जिल्ह्यात येत असते; परंतु संपामुळे याचा परिणाम मुरु डसह इतर तालुक्यांनाही सहन करावा लागला. याबाबत काही दुकानदारांकडे चौकशी केली असता सांगली, सातारा, कोल्हापूर व श्रीगोंदा (नगर) येथून येणारे ट्रक त्या भागात थांबल्यामुळे येथे शुक्रवारी दूध पोहचू न शकल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.भाजीपाला - दुधाची आवक घटलीनागोठणे : शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे. या बंदमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातून मुंबईकडे येणारी भाजीपाला, तसेच दुधाची वाहने येणे दुरापास्त झाल्याने संप असाच चालू राहिला, तर शनिवारपासून भाजी, दुधाची मोठ्या प्रमाणात उणीव भासणार आहे. नागोठण्यात येणाऱ्या स्थानिक भाजी, फळे दुधाची आवक फक्त ५ ते ७ टक्केच आहे. उर्वरित भाजीपाला, फळे, पेण, पनवेल, पुणे आणि नवी मुंबईतील घाऊक बाजारातून येत असल्याने दुसऱ्या दिवशीच त्याची आवक घटली आहे.मोहोपाड्यात भाजीचे दुप्पट दर१मोहोपाडा : शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजीपाला व दुधाची आवक घटल्यामुळे भाजीपाला महागला. २ जून संपाचा दुसरा दिवस असल्याने रसायनी परिसराचा केंद्रबिदू असणाऱ्या मोहोपाडा शहरात भाजीपाल्याची आवक कमी प्रमाणात होती. यामुळे काही भाजीपाल्याची दुकाने बंद होती. मोहोपाडा भाजीबाजारातील भाजीविक्र ी व्यवसाय शुक्र वारी थंडावला होता. इतर दिवसांच्या तुलनेत आज भाजीचे दर तिप्पट, चौपट झाल्याचे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी २० रुपयांनी विकली जाणारी कोथिंबीर जुडी आज बाजारात १५० ते २०० रुपये दराने विकली गेली. तर मिरची १५० किलो, टोमॅटो ७० रुपये किलो, वांगी १०० रुपये किलो असे प्रत्येक भाजीसह पालेभाज्याही महागल्या होत्या. काँटेज, रिसॉर्ट, खाणावळीला बसला फटका२रेवदंडा : शेतकरी संपावर गेल्याने घाटमाथ्यावरील भाजी व फळे बाजारात दाखल न झाल्याने, शुक्रवारी भाजी व फळबाजारात शुकशुकाट होता. अनेक विक्रेते पेण किंवा वाशी मार्केटमधून भाजी व फळे आणतात; पण काही जणांनी संपाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी न जाणे पसंत केलेले दिसत असून, बाजारात भाजी व फळांची आवक थंडावली आहे. सध्या मुस्लीम समाजाचा रमजान हा उपवासाचा महिना सुरू असल्याने सर्वच फळांना मागणी आहे. मात्र, बाजारात फळांची आवक घटल्याने भाव कडाडलेले दिसत असून आंबा बाजारही अजून तेजीत आहे. दरम्यान, स्थानिक भाजीपाला मळे सुकल्याने उपलब्ध दिसत नाही. शेतकरी संपावर गेल्याने काँटेज, रिसॉर्ट, खाणावळी यांना फटका बसला आहे. आता कॉटेज, रिसॉर्टवाले यांनी भाज्या कमी उपलब्ध असल्याने कडधान्ये खरेदीकडे मोर्चा वळविला असून, कडधान्ये पर्यटकांची थाळी सजवताना दिसत आहेत.