शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
6
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
7
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
8
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
9
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
10
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
11
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
12
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
13
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
14
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
15
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
16
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
17
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
18
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
19
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
20
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क

शेतकरी संपाचा फटका

By admin | Updated: June 3, 2017 06:31 IST

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, तसेच इतर न्यायपूर्ण मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले आहेत. त्यामुळे भाजीपाल्यासमवेतच

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/ मुरु ड : शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, तसेच इतर न्यायपूर्ण मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले आहेत. त्यामुळे भाजीपाल्यासमवेतच दुधाचेही ट्रक अडविल्यामुळे शुक्रवारी मुरु डकरांना दुधाची चणचण भासली. सातारा, कोल्हापूर, सांगली या परिसरातून वेगवेगळ्या कंपन्यांचे दूध रायगड जिल्ह्यात येत असते; परंतु संपामुळे याचा परिणाम मुरु डसह इतर तालुक्यांनाही सहन करावा लागला. याबाबत काही दुकानदारांकडे चौकशी केली असता सांगली, सातारा, कोल्हापूर व श्रीगोंदा (नगर) येथून येणारे ट्रक त्या भागात थांबल्यामुळे येथे शुक्रवारी दूध पोहचू न शकल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.भाजीपाला - दुधाची आवक घटलीनागोठणे : शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे. या बंदमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातून मुंबईकडे येणारी भाजीपाला, तसेच दुधाची वाहने येणे दुरापास्त झाल्याने संप असाच चालू राहिला, तर शनिवारपासून भाजी, दुधाची मोठ्या प्रमाणात उणीव भासणार आहे. नागोठण्यात येणाऱ्या स्थानिक भाजी, फळे दुधाची आवक फक्त ५ ते ७ टक्केच आहे. उर्वरित भाजीपाला, फळे, पेण, पनवेल, पुणे आणि नवी मुंबईतील घाऊक बाजारातून येत असल्याने दुसऱ्या दिवशीच त्याची आवक घटली आहे.मोहोपाड्यात भाजीचे दुप्पट दर१मोहोपाडा : शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजीपाला व दुधाची आवक घटल्यामुळे भाजीपाला महागला. २ जून संपाचा दुसरा दिवस असल्याने रसायनी परिसराचा केंद्रबिदू असणाऱ्या मोहोपाडा शहरात भाजीपाल्याची आवक कमी प्रमाणात होती. यामुळे काही भाजीपाल्याची दुकाने बंद होती. मोहोपाडा भाजीबाजारातील भाजीविक्र ी व्यवसाय शुक्र वारी थंडावला होता. इतर दिवसांच्या तुलनेत आज भाजीचे दर तिप्पट, चौपट झाल्याचे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी २० रुपयांनी विकली जाणारी कोथिंबीर जुडी आज बाजारात १५० ते २०० रुपये दराने विकली गेली. तर मिरची १५० किलो, टोमॅटो ७० रुपये किलो, वांगी १०० रुपये किलो असे प्रत्येक भाजीसह पालेभाज्याही महागल्या होत्या. काँटेज, रिसॉर्ट, खाणावळीला बसला फटका२रेवदंडा : शेतकरी संपावर गेल्याने घाटमाथ्यावरील भाजी व फळे बाजारात दाखल न झाल्याने, शुक्रवारी भाजी व फळबाजारात शुकशुकाट होता. अनेक विक्रेते पेण किंवा वाशी मार्केटमधून भाजी व फळे आणतात; पण काही जणांनी संपाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी न जाणे पसंत केलेले दिसत असून, बाजारात भाजी व फळांची आवक थंडावली आहे. सध्या मुस्लीम समाजाचा रमजान हा उपवासाचा महिना सुरू असल्याने सर्वच फळांना मागणी आहे. मात्र, बाजारात फळांची आवक घटल्याने भाव कडाडलेले दिसत असून आंबा बाजारही अजून तेजीत आहे. दरम्यान, स्थानिक भाजीपाला मळे सुकल्याने उपलब्ध दिसत नाही. शेतकरी संपावर गेल्याने काँटेज, रिसॉर्ट, खाणावळी यांना फटका बसला आहे. आता कॉटेज, रिसॉर्टवाले यांनी भाज्या कमी उपलब्ध असल्याने कडधान्ये खरेदीकडे मोर्चा वळविला असून, कडधान्ये पर्यटकांची थाळी सजवताना दिसत आहेत.