शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

स्मार्ट सिटीसाठी मुख्यमंत्र्यांचा दिलासा

By admin | Updated: December 12, 2015 01:51 IST

सत्ताधाऱ्यांनी विरोध केला तरी नवी मुंबई स्मार्ट सिटी करण्यासाठी शिवसेना व भाजपा नेत्यांनी पुढाकार घेतला आहे.

नवी मुंबई : सत्ताधाऱ्यांनी विरोध केला तरी नवी मुंबई स्मार्ट सिटी करण्यासाठी शिवसेना व भाजपा नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना वस्तुस्थिती सांगितले. मुख्यमंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत या स्पर्धेसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या असून त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईला देशात तिसरे व राज्यात प्रथम मानांकन मिळाले होते. यामुळे ९८ शहरांच्या स्पर्धेमध्ये नवी मुंबईला पहिला क्रमांक मिळेल असा विश्वास नागरिकांना वाटू लागला होता. पहिल्यांदाच विकासकामांचे धोरण ठरविताना नागरिकांचे मत ऐकून घेण्यात आले होते. चार लाख नागरिकांनी त्यांच्या संकल्पना महापालिकेस कळविल्या होत्या. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव फेटाळल्यामुळे महापालिकेच्या सहभागाविषयी शंका उपस्थित केली जात होती. याविषयी शहरवासीयांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. शिवसेना व भाजपाने आंदोलन करून राष्ट्रवादीचा निषेध केला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँगे्रसने राजकारण करून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव फेटाळला आहे. परंतु शहरवासीयांना स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभाग हवा आहे.नवी मुंबई देशातील एक क्रमांकाचे शहर झाले पाहिजे अशी सर्वांची भावना असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटीविषयी प्रस्ताव १५ डिसेंबरच्या आतमध्ये केंद्र शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी माहिती घेवून तत्काळ हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळणार असून स्मार्ट सिटी स्पर्धेतील सहभागी होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही राज्याच्या मुख्य सचिवांना स्मार्ट सिटी प्रस्तावाचे प्रेझेंटेशन दाखविले. महापालिका ८ हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर जाणार आहे. स्मार्ट सिटी प्रस्तावाविषयी आक्षेप असतील तर ते दुरूस्त करावे परंतु राजकारण करून स्पर्धेतून माघार घेवू नये, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत. (प्रतिनिधी)नवी मुंबईचा स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभाग झालाच पाहिजे अशी लोकभावना आहे. प्रस्तावामध्ये काही त्रुटी असतील तर त्यामध्ये सुधारणा करता येवू शकते.त्यासाठी स्पर्धेतून माघार हा उपाय नाही. यामुळे स्मार्ट सिटीसाठी वेळेत प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत. - एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे