शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी मुख्यमंत्र्यांचा दिलासा

By admin | Updated: December 12, 2015 01:51 IST

सत्ताधाऱ्यांनी विरोध केला तरी नवी मुंबई स्मार्ट सिटी करण्यासाठी शिवसेना व भाजपा नेत्यांनी पुढाकार घेतला आहे.

नवी मुंबई : सत्ताधाऱ्यांनी विरोध केला तरी नवी मुंबई स्मार्ट सिटी करण्यासाठी शिवसेना व भाजपा नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना वस्तुस्थिती सांगितले. मुख्यमंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत या स्पर्धेसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या असून त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईला देशात तिसरे व राज्यात प्रथम मानांकन मिळाले होते. यामुळे ९८ शहरांच्या स्पर्धेमध्ये नवी मुंबईला पहिला क्रमांक मिळेल असा विश्वास नागरिकांना वाटू लागला होता. पहिल्यांदाच विकासकामांचे धोरण ठरविताना नागरिकांचे मत ऐकून घेण्यात आले होते. चार लाख नागरिकांनी त्यांच्या संकल्पना महापालिकेस कळविल्या होत्या. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव फेटाळल्यामुळे महापालिकेच्या सहभागाविषयी शंका उपस्थित केली जात होती. याविषयी शहरवासीयांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. शिवसेना व भाजपाने आंदोलन करून राष्ट्रवादीचा निषेध केला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँगे्रसने राजकारण करून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव फेटाळला आहे. परंतु शहरवासीयांना स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभाग हवा आहे.नवी मुंबई देशातील एक क्रमांकाचे शहर झाले पाहिजे अशी सर्वांची भावना असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटीविषयी प्रस्ताव १५ डिसेंबरच्या आतमध्ये केंद्र शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी माहिती घेवून तत्काळ हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळणार असून स्मार्ट सिटी स्पर्धेतील सहभागी होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही राज्याच्या मुख्य सचिवांना स्मार्ट सिटी प्रस्तावाचे प्रेझेंटेशन दाखविले. महापालिका ८ हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर जाणार आहे. स्मार्ट सिटी प्रस्तावाविषयी आक्षेप असतील तर ते दुरूस्त करावे परंतु राजकारण करून स्पर्धेतून माघार घेवू नये, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत. (प्रतिनिधी)नवी मुंबईचा स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभाग झालाच पाहिजे अशी लोकभावना आहे. प्रस्तावामध्ये काही त्रुटी असतील तर त्यामध्ये सुधारणा करता येवू शकते.त्यासाठी स्पर्धेतून माघार हा उपाय नाही. यामुळे स्मार्ट सिटीसाठी वेळेत प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत. - एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे