शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचा रानमेव्याला फटका?

By admin | Updated: May 12, 2016 02:17 IST

कोकणात सध्या रानमेव्याला मागणी असली तरी गेले काही दिवस विविध भागांत पडणारा अवेळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे डोंगरची मैना रुसणार, असे चित्र निर्माण झाले आहे

दासगाव : कोकणात सध्या रानमेव्याला मागणी असली तरी गेले काही दिवस विविध भागांत पडणारा अवेळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे डोंगरची मैना रुसणार, असे चित्र निर्माण झाले आहे. करवंदांसारख्या विविध रानमेव्यांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावागावात डोंगर आणि जमिनी विकण्याकडे ग्रामीण भागात कल वाढल्याने धनदांडग्यांनी हे डोंगर बोडके करण्याचा सपाटा लावला आहे. या वनतोडीमुळे करवंदाची रोपटी नष्ट होत असल्याने भविष्यात या रानमेव्याला चाकरमान्यांनादेखील मुकावे लागणार अशी, स्थिती निर्माण होत आहे. याच रानमेव्यावर उन्हाळ्यात आदिवासींचा उदरनिर्वाह चालतो. हा रानमेवा आता डोंगरावर मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे.कोकणात मे महिन्यात सुटीच्या कालावधीत नोकरी-धंद्यानिमित्ताने बाहेरगावी गेलेला चाकरमानी आपल्या गावात येतो. सुटीच्या काळात लहानापासून मोठ्यापर्यंत सारेच जण गावातील आंबे, रानातील करवंदे, काजूची बोंडे, आळू, जांभळे अशी विविध रानफळे खाण्यात गुंग होतात. आता रानमेव्याचा मोसम असून, रानात करवंद, जांभळे, आळू पिकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यात निर्माण होणारे ढगाळ वातावरण, विविध भागात पडणारा पाऊस यामुळे हा मोसम हातून निघून जातो की काय, असे वाटू लागले आहे. पिकणारी करवंदे आणि जांभळावर पाऊस पडल्यास ही फळे बेचव होऊन जातात तर ताडफळे गळून खाली पडतात. रानमेवा खाण्याकरिता गावात आलेल्या चाकरमान्यांची पावले रानाकडे वळू लागली असतानाच पावसामुळे हा रानमेवा रुसतो की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.महाड तालुक्यात सर्वच भागात करवंदाची झुडपे आहेत. मधूर ही करवंदे कोकण वगळता इतर जिल्ह्यांत तसेच मोठ्या शहरांत मागणी असल्याने येथील आदिवासी ही करवंदे रानात जाऊन काढतात. आदिवासी करवंदे, जांभळे अशी रानफळे विकून चरितार्थ चालवत आहेत.(वार्ताहर)