शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

ढगाळ वातावरणाचा रानमेव्याला फटका?

By admin | Updated: May 12, 2016 02:17 IST

कोकणात सध्या रानमेव्याला मागणी असली तरी गेले काही दिवस विविध भागांत पडणारा अवेळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे डोंगरची मैना रुसणार, असे चित्र निर्माण झाले आहे

दासगाव : कोकणात सध्या रानमेव्याला मागणी असली तरी गेले काही दिवस विविध भागांत पडणारा अवेळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे डोंगरची मैना रुसणार, असे चित्र निर्माण झाले आहे. करवंदांसारख्या विविध रानमेव्यांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावागावात डोंगर आणि जमिनी विकण्याकडे ग्रामीण भागात कल वाढल्याने धनदांडग्यांनी हे डोंगर बोडके करण्याचा सपाटा लावला आहे. या वनतोडीमुळे करवंदाची रोपटी नष्ट होत असल्याने भविष्यात या रानमेव्याला चाकरमान्यांनादेखील मुकावे लागणार अशी, स्थिती निर्माण होत आहे. याच रानमेव्यावर उन्हाळ्यात आदिवासींचा उदरनिर्वाह चालतो. हा रानमेवा आता डोंगरावर मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे.कोकणात मे महिन्यात सुटीच्या कालावधीत नोकरी-धंद्यानिमित्ताने बाहेरगावी गेलेला चाकरमानी आपल्या गावात येतो. सुटीच्या काळात लहानापासून मोठ्यापर्यंत सारेच जण गावातील आंबे, रानातील करवंदे, काजूची बोंडे, आळू, जांभळे अशी विविध रानफळे खाण्यात गुंग होतात. आता रानमेव्याचा मोसम असून, रानात करवंद, जांभळे, आळू पिकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यात निर्माण होणारे ढगाळ वातावरण, विविध भागात पडणारा पाऊस यामुळे हा मोसम हातून निघून जातो की काय, असे वाटू लागले आहे. पिकणारी करवंदे आणि जांभळावर पाऊस पडल्यास ही फळे बेचव होऊन जातात तर ताडफळे गळून खाली पडतात. रानमेवा खाण्याकरिता गावात आलेल्या चाकरमान्यांची पावले रानाकडे वळू लागली असतानाच पावसामुळे हा रानमेवा रुसतो की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.महाड तालुक्यात सर्वच भागात करवंदाची झुडपे आहेत. मधूर ही करवंदे कोकण वगळता इतर जिल्ह्यांत तसेच मोठ्या शहरांत मागणी असल्याने येथील आदिवासी ही करवंदे रानात जाऊन काढतात. आदिवासी करवंदे, जांभळे अशी रानफळे विकून चरितार्थ चालवत आहेत.(वार्ताहर)