शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मराठी संस्कृती प्रतिष्ठानची श्रमदानातून स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:01 IST

श्रीवर्धनमधील मराठी संस्कृती प्रतिष्ठानने स्वच्छतेचा वसा लोकसहभागातून जोपासला असून, समाजोपयोगी विविध उपक्रम प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून राबवत आहे.

संतोष सापतेश्रीवर्धन : श्रीवर्धनमधील मराठी संस्कृती प्रतिष्ठानने स्वच्छतेचा वसा लोकसहभागातून जोपासला असून, समाजोपयोगी विविध उपक्रम प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून राबवत आहे.प्रतिष्ठानची स्थापना ९ मार्च २०११ मध्ये प्रशांत शिंदे यांनी केली असून, सध्या १५० सदस्य कार्यरत आहेत. स्वच्छतेला प्रतिष्ठान अग्रक्रम देत असून, सणासुदीला प्रत्येक मंदिर प्रतिष्ठानचे सभासद झाडून पुसून स्वच्छ करतात. गणेशोत्सवात दीड दिवस, पाच दिवस व अकरा दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर गणेशमूर्तींचे पुनश्च विसर्जन केले जाते.श्रीवर्धन नगरपालिकेने राबविलेल्या विविध स्वच्छता मोहिमेत प्रतिष्ठानचे सभासद हिरिरीने भाग घेऊन स्वच्छ व निरोगी श्रीवर्धन ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सेवा, संस्कार व सुरक्षितता या ब्रीदवाक्यानुसार मराठी प्रतिष्ठान श्रीवर्धनमध्ये कार्यरत आहे. श्रीवर्धनमधील तरुणाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करत आहे. श्रीवर्धन एसटी स्टॅण्ड, शिवाजी चौक, सार्वजनिक कार्यालय, श्रीवर्धनचा विस्तीर्ण समुद्रकिनारा व स्मशानभूमी स्वच्छ ठेवण्यासाठी मराठी प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्नशील असते.शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर रायगड किल्ल्याच्या स्वच्छतेत मराठी प्रतिष्ठान महत्त्वाची भूमिका बजावते. श्रीवर्धन शहरात पर्जन्यमान जास्त असल्याने विविध पाखड्यामध्ये पाणी तुंबते. त्या वेळी नगरपालिका व प्रतिष्ठानचे सभासद स्वच्छतेचा प्रश्नांसाठी सर्वत्र जोमाने कार्य करतात. श्रीवर्धन गावातील कुसमा देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी असणाºया रस्त्यांची दुरु स्ती प्रतिष्ठानने पावसाळ्यात श्रमदान करून केली. सोमजाई माता ही श्रीवर्धनची ग्रामदेवता आहे. त्या मंदिराची साफसफाई, वाढलेले गवत व मोकाट जनावरांनी केलेली घाण प्रतिष्ठान वेळोवेळी साफ करतात.श्रीवर्धन समुद्रकिनाºयावर असलेल्या स्मशानभूमीकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्या वेळी प्रतिष्ठानने सभासदांकडून किनाºयावरील स्मशानभूमीची स्वच्छता केली. मराठी प्रतिष्ठान स्वच्छतेसोबत संस्कृती संवर्धनाचे कार्य अतिशय उत्तमरीत्या पार पाडत आहे. गुढीपाडव्याला सभासद पारंपरिक वेशभूषा करून ग्रामदेवता सोमजाई माता मंदिरापासून संपूर्ण श्रीवर्धन शहरात प्रभात फेरी काढतात. त्या वेळी संस्कृती रक्षण, स्वच्छतेविषयी जनजागृती, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरणाबाबत मार्गदर्शन करण्यात येते. 

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबईSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान