शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

शहरातील प्रमुख स्थळांची स्वच्छता, विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही मोठा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:13 IST

स्वच्छ भारत मिशनच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत स्वच्छताविषयक विविध उपक्र म राबविण्यात आले असून शाळा

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत स्वच्छताविषयक विविध उपक्र म राबविण्यात आले असून शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. रविवारी स्वच्छता उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख स्थळांची व्यापक प्रमाणात सफाई मोहीम राबविण्यात आली.महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्रमदान करण्यात आले. यावेळी मोहिमेमध्ये ज्वेल आॅफ नवी मंबई, नेरु ळ, छत्रपती शिवाजी चौक व जागृतेश्वर मंदिर, वाशी, सेक्टर २ परिसर, सीबीडी बेलापूर, सानपाडा तलाव, तुर्भे, मुलुंड-ऐरोली उड्डाणपूल, ऐरोली अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता श्रमदान करून उपस्थित नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. लोकमान्य टिळक कॉलेजमधील एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांनी कोपरखैरणे परिसरात ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण व स्वच्छतेसाठी रॅली काढण्यात आली. यावेळी विभागातील सहा. आयुक्त, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता उप निरीक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, स्वच्छाग्रही व नागरिक सहभागी झाले होते.नवी मंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी स्वच्छता करून श्रमदान करण्यात आले. तसेच सीबीडी सेक्टर ८ बी येथील संभाजी नगर याठिकाणी स्थानिक नागरिकांच्या सहाभागने स्वच्छता मोहीम राबवून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी उपस्थित नागरिकांना स्वच्छता व कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून दिले. या मोहिमेअंतर्गत तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर येथे महानगरपालिका शाळा क्र मांक १०३ मधील विद्यार्थ्यांमार्फत विभागामध्ये रॅलीचे आयोजन करून प्लास्टीक बंदी, कचरा वर्गीकरण याबाबत संदेश देण्यात आले. तसेच घणसोली येथील मुंब्रादेवी परिसरातही विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यावेळी स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, स्वच्छता अधिकारी, निरीक्षक, उपनिरीक्षक, विद्यार्थी, कर्मचारी सहभागी झाले होते.स्वच्छतेबाबत जनजागृती‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत प्लास्टीकचा वापर टाळा, ओला व सुका कचरा वेगळा करा, कचरा वर्गीकरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून जनजागृती करण्यातआली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान