शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शासकीय कार्यालयांकडूनच स्वच्छता अभियानाचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 03:34 IST

आवारातच डेब्रिजचे साम्राज्य : महापालिकेसह इतर यंत्रणांची स्वच्छतेबाबत उदासीनता

योगेश पिंगळे

नवी मुंबई : सध्या शहरात स्वच्छ शहर अभियानांतर्गत विविध कामे सुरू आहेत; परंतु या मोहिमेची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणांनाच या अभियानाचेच गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. महापालिका, सिडको, कोकण भवन व पोलीस ठाण्याच्या आवारातील डेब्रिज व कचरा पाहिल्यास या अभियानाचे वाभाडे निघाल्याचे दिसून येते.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण या उपक्र मात नवी मुंबई महापालिकेने २०१७ साली स्वच्छतेत देशात आठवा तर राज्यात पहिला क्र मांक पटकाविला होता, तर २०१८ साली झालेल्या याच उपक्रमात घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशात सर्वोत्तम शहर म्हणून नामांकन प्राप्त केले आहे. शहरात अभियान राबविताना महापालिका प्रशासनाला पालिका मुख्यालय आणि पालिकेच्या इतर कार्यालयांच्या आवारातील स्वच्छतेचा विसर पडला आहे. महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर भंगार साहित्य, वापरात नसलेली आणि धुळीने माखलेली बंद वाहने, डेब्रिज, मुख्यालयावर रोषणाई करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या आदी साहित्य पडले आहे. तसेच पालिका विभाग कार्यालयांच्या आवारात फेरीवाल्यांचे जप्त केलेले साहित्य, हातगाड्या, गॅस सिलिंडर, डेब्रिज, खिडक्यांच्या तुटलेल्या काचा, नामफलक, जप्त केले बॅनर, कचऱ्याचे ढीग, प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोल आदी भंगार साहित्य गेल्या अनेक वर्षांपासून पडलेले आहे.कोकण भवन इमारतीच्या परिसरात डेब्रिज, अपघातग्रस्त आणि भंगार वाहने, झाकणे नसलेली ड्रेनेजची गटारे, उघड्यावरील सांडपाणी, उघड्यावर टाकलेला कचरा आदी साहित्य पडलेले आहे. सिडको मुख्यालयाच्या वाहने पार्किंगच्या आवारात डेब्रिज आणि कचºयाचे साम्राज्य पसरले असून गेल्या अनेक वर्षांपासून भंगार वाहने उभी करण्यात आली आहेत. पोलीस ठाण्यांच्या आवारात तसेच रस्त्याच्या कडेला अपघातग्रस्त आणि जप्त केलेली वाहने मोठ्या प्रमाणावर असून यामुळे परिसराला बकाल रूप प्राप्त झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण हा केंद्र शासनाचा उपक्रम असून महापालिकासह सर्वच शासकीय यंत्रणांवर याची जबाबदारी आहे. परंतू या कार्यालयांच्या आवारातच कचरा आणि भंगार साहित्याचे ढीग साचल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई