शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

कर्जत तालुक्यातील ११ विहिरींची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:06 IST

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याचे निर्जीव झालेले नैसर्गिक स्रोत पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रि या सुरू केली आहे.

कर्जत : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याचे निर्जीव झालेले नैसर्गिक स्रोत पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रि या सुरू केली आहे. त्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील ११ विहिरींची स्वच्छता करण्यात आली.कर्जत तालुक्यातील श्री सदस्यांनी माती तसेच दगड आणि झाडाझुडपांनी व्यापून टाकल्याने बंद अवस्थेत असलेल्या विहिरी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. त्या पूर्णपणे बंद असलेल्या विहिरी पुन्हा जिवंत करण्याचा उपक्र म डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून जलसंवर्धनअंतर्गत हाती घेतला आहे. कर्जत तालुक्यातील पोशीर आणि कळंब ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठ्यासाठी महत्वाच्या असलेल्या ११ विहिरी स्वच्छ करण्यात आल्या. एकावेळी सर्व ठिकाणी श्रीसदस्य विहिरीमध्ये उतरले होते. त्यातील काही विहिरींकडे अनेक वर्षांपासून कोणीही फिरकले नसल्याने त्या मोडकळीस येण्याच्या स्थितीत आहेत. अशा विहिरीमधील जिवंत नैसर्गिक झऱ्यांना वाट करून देताना विहिरीचे तुटलेले दगड व्यवस्थित लावण्याचे काम श्रीसदस्यांनी के ले. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन धर्माधिकारी यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जलसंवर्धन मोहीम हाती घेतली आहे. त्यातून कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीमधील बोरीचीवाडी, बाटलीची वाडी, मिरचुलवाडी तसेच पाटगाव याप्रमाणे पोशीर ग्रामपंचायतीमधील देवपाडा, चिंचवाडी, वाघ्याचीवाडी येथील विहिरींची स्वच्छता प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आली. एकावेळी ५०० श्रीसदस्यांनी विहिरीचा तळ पूर्वी कुठे होता, तेथपर्यंत साचून राहिलेला गाळ तसेच माती, प्लास्टिक, बाटल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या विहिरीमध्ये उगवलेली झाडे - झुडपे आणि सुकलेले गवत काढून टाकले. त्यासाठी तरुण श्रीसदस्य विहिरीमध्ये दोराच्या सहाय्याने उतरत होते. साधारण ८० हजार किलो कचरा विहिरींमधून बाहेर काढण्यात आला असून त्यात सर्व प्रकारचा कचरा होता.तो सर्व कचरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छ केलेल्या विहिरीच्या परिसरातून काढून ट्रॅक्टरमध्ये भरून दूर टाकण्यात आला.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या नवीन जलसंवर्धन उपक्र मामुळे बंद असलेल्या अनेक विहिरींना नवसंजीवनी मिळणार असून स्वच्छ केलेल्या विहिरीमध्ये पाणीसाठा पिण्यासाठी वापर व्हावा हा उद्देश असल्याचे श्रीसदस्यांनी सांगितले. (वार्ताहर)