शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यातील ११ विहिरींची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:06 IST

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याचे निर्जीव झालेले नैसर्गिक स्रोत पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रि या सुरू केली आहे.

कर्जत : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याचे निर्जीव झालेले नैसर्गिक स्रोत पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रि या सुरू केली आहे. त्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील ११ विहिरींची स्वच्छता करण्यात आली.कर्जत तालुक्यातील श्री सदस्यांनी माती तसेच दगड आणि झाडाझुडपांनी व्यापून टाकल्याने बंद अवस्थेत असलेल्या विहिरी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. त्या पूर्णपणे बंद असलेल्या विहिरी पुन्हा जिवंत करण्याचा उपक्र म डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून जलसंवर्धनअंतर्गत हाती घेतला आहे. कर्जत तालुक्यातील पोशीर आणि कळंब ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठ्यासाठी महत्वाच्या असलेल्या ११ विहिरी स्वच्छ करण्यात आल्या. एकावेळी सर्व ठिकाणी श्रीसदस्य विहिरीमध्ये उतरले होते. त्यातील काही विहिरींकडे अनेक वर्षांपासून कोणीही फिरकले नसल्याने त्या मोडकळीस येण्याच्या स्थितीत आहेत. अशा विहिरीमधील जिवंत नैसर्गिक झऱ्यांना वाट करून देताना विहिरीचे तुटलेले दगड व्यवस्थित लावण्याचे काम श्रीसदस्यांनी के ले. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन धर्माधिकारी यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जलसंवर्धन मोहीम हाती घेतली आहे. त्यातून कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीमधील बोरीचीवाडी, बाटलीची वाडी, मिरचुलवाडी तसेच पाटगाव याप्रमाणे पोशीर ग्रामपंचायतीमधील देवपाडा, चिंचवाडी, वाघ्याचीवाडी येथील विहिरींची स्वच्छता प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आली. एकावेळी ५०० श्रीसदस्यांनी विहिरीचा तळ पूर्वी कुठे होता, तेथपर्यंत साचून राहिलेला गाळ तसेच माती, प्लास्टिक, बाटल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या विहिरीमध्ये उगवलेली झाडे - झुडपे आणि सुकलेले गवत काढून टाकले. त्यासाठी तरुण श्रीसदस्य विहिरीमध्ये दोराच्या सहाय्याने उतरत होते. साधारण ८० हजार किलो कचरा विहिरींमधून बाहेर काढण्यात आला असून त्यात सर्व प्रकारचा कचरा होता.तो सर्व कचरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छ केलेल्या विहिरीच्या परिसरातून काढून ट्रॅक्टरमध्ये भरून दूर टाकण्यात आला.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या नवीन जलसंवर्धन उपक्र मामुळे बंद असलेल्या अनेक विहिरींना नवसंजीवनी मिळणार असून स्वच्छ केलेल्या विहिरीमध्ये पाणीसाठा पिण्यासाठी वापर व्हावा हा उद्देश असल्याचे श्रीसदस्यांनी सांगितले. (वार्ताहर)