शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सफाई कामगारांचा पालिकेकडून सत्कार

By admin | Updated: May 13, 2017 01:20 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत १ ते १५ मे दरम्यान विशेष अभियानाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या सफाई कामगारांचा विशेष गौरव करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत १ ते १५ मे दरम्यान विशेष अभियानाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या सफाई कामगारांचा विशेष गौरव करण्यात येत आहे.स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला देशात ८ वे व राज्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. या यशामध्ये शहरातील सफाई कामगारांचा वाटा मोठा आहे. कामगार नियमितपणे साफसफाईचे काम प्रामाणिकपणे करत असल्यामुळे पालिकेला देशपातळीवरील स्पर्धेत यश मिळविता आले. याच अभियानाचा भाग म्हणून सफाई कामगारांचा सन्मान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाने शुक्रवारी दिघा विभाग कार्यालयामध्ये साफसफाई कामगारांचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये कामगारांना पुरस्कार देवून सन्मानित केले. याशिवाय कामगार व नागरिकांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण व्हावे यासाठी एकमेकांना मैत्रीचा धागा बांधण्यात आला. कामगारांसाठी प्रथमच विभाग कार्यालयामध्ये भोजनाचे आयोजन केले होते. कामगारांना स्वच्छतेची शपथ देवून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये अशाप्रकारे कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दिघा विभाग कार्यालयात आयोजित कार्यक्रमास विभाग अधिकारी प्रकाश वाघमारे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, राजेंद्र इंगळे, सुधाकर वडजे, राजू बोरकर, तेजस ताटे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.