शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
4
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
5
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
6
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
7
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
9
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
10
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
11
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
12
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
13
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
14
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
15
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
16
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
17
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
18
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
19
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
20
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

लोगोवरील दावा सोडणार नाही

By admin | Updated: September 23, 2015 23:50 IST

मीरा-भार्इंदर पालिकेतील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे प्रशासनावर गेल्या २४ वर्षांपासून वापरात असलेला अनोंदणीकृत लोगो सेव्हन ईलेव्हन ग्रुप आॅफ कंपनीज्ने हायजॅक केला असला

राजू काळे, भार्इंदरमीरा-भार्इंदर पालिकेतील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे प्रशासनावर गेल्या २४ वर्षांपासून वापरात असलेला अनोंदणीकृत लोगो सेव्हन ईलेव्हन ग्रुप आॅफ कंपनीज्ने हायजॅक केला असला तरी त्यावरील दावा आम्ही कदापी सोडणार नसल्याचा पावित्रा लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे जागे झालेल्या प्रशासनाने घेतला आहे.ग्रामपंचायतीनंतर १९९१ मध्ये प्रथमच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांनी त्यावेळचे नगरसेवक लियो कोलासो यांनी ९ ग्रामपंचायतीसह आरोग्य सेवा, शहरीकरण, शेतकरी, मीठागरे, डोंगराळभाग आदींचा समावेश असलेला लोगो तयार करुन तो मान्यतेसाठी नियोजन समितीपुढे ठेवला होता. त्यावेळचे नगराध्यक्ष गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखालील समितीने लोगोला मान्यता दिल्यानंतर तसा लेखी ठराव पालिका दप्तरी असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आसिफ शेख यांनी लोकमतला दिली आहे. तेव्हापासून हा लोगो पालिका व्यवहारात असून तो अद्यापही नोंदणीकृत न झाल्यावर मात्र त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अखेर तो भाजपा आ. नरेंद्र मेहतांच्या सेव्हन ईलेव्हन ग्रुप आॅफ कंपनीज्ने नोव्हेंबर २०१३ मध्ये नोंदणीकृत केल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आल्याने पालिकेवर, अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या लोगोला गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. हा संतापजनक प्रकार लोकमतने २१ सप्टेंबरच्या अंकातील वृत्तातून उजेडात आणल्यानंतर शहरभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अनेक राजकीय पक्ष प्रशासनाच्या नाकर्तेपणावर आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याने प्रशासनाकडून सारवासारव करण्यास सुरुवात झाली आहे.पालिका उपायुक्त (मुख्यालय) गणेश देशमुख यांनी, संबंधित कंपनीने लोगोच्या नोंदणीसाठी जानेवारी २०१४ मध्ये अर्ज केल्याचा दावा करुन पालिकेला त्याची माहिती दिल्यानंतर मार्च २०१४ मध्ये प्रशासनाने लोगो नोंदणीसाठी अर्ज केल्याची माहिती दिली आहे. परंतु, कंपनीने दीड वर्षांपूर्वीच लोगो नोंदणीकृत केला असतानाही अद्याप महापालिकेचा लोगो नोंदणीकृत झालेला नाही. नोंदणी अर्जानंतर तो १९ महिन्यानंतर नोंदणीकृत करण्यात येत असल्याचा दावाही उपायुक्तांनी केला आहे. काहीही असो अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या लोगोवरील दावा मात्र पालिका कोणत्याही स्थितीत सोडणार नसल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.