शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 01:25 IST

कोपरखैरणे परिसराला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. एमआयडीसी क्षेत्रात चालणारे अनियंत्रित दगडखाणीतील उत्खनन, कारखान्यातून प्रक्रिया न करता खाडीत सोडले जाणारे

नवी मुंबई : कोपरखैरणे परिसराला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. एमआयडीसी क्षेत्रात चालणारे अनियंत्रित दगडखाणीतील उत्खनन, कारखान्यातून प्रक्रिया न करता खाडीत सोडले जाणारे रसायनमिश्रित सांडपाणी आदीमुळे हा परिसर प्रदूषित झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यमान धोक्यात आले आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करून सुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने येथील रहिवाशांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. रहिवाशांच्या एक शिष्टमंडळाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवनियुक्त क्षेत्रीय अधिकारी अनिल मोहेकर यांची भेट घेऊन यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. ठाणे-बेलापूर रस्त्याच्या एका बाजूला आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत तर दुसऱ्या बाजूला नागरी वसाहती आहेत. यात प्रामुख्याने ऐरोली, घणसोली व कोपरखैरणे या नोड्सचा समावेश आहे. औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. परंतु अनेक कारखानदार या नियमाला फाटा देत हे रसायनमिश्रित पाणी शेजारच्या खाडीत सोडून देतात. त्यामुळे खाडीतील पाणी दूषित होऊन स्थानिकांच्या पारंपरिक मासेमारीच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. त्याचबरोबर नागरी आरोग्यही धोक्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रातून सोडल्या जाणाऱ्या या दूषित सांडपाण्यामुळे नागरी वसाहतीतील नालेही प्रदूषित झाले आहेत. कोपरखैरणे सेक्टर ११ या वसाहतीच्या समोरील बाजूस पावणे एमआयडीसी आहे. येथील रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी प्रक्रिया न करताच पावणे नाल्यात सोडले जाते. या नाल्यातून २४ तास उग्र वास येतो. त्यातून विषारी गॅस बाहेर पडत असल्याने त्यामुळे श्वसन, दमा, टीबी, कॅन्सर अशा जीवघेण्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. आमदार संदीप नाईक व स्थानिक नगरसेवक मुनावर पटेल यांच्यासमवेत रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून नव्यानेच नियुक्त अनिल मोहेकर यांची भेट घेतली. यातील गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची मागणी नाईक यांनी केली. यासंदर्भात चौकशी करून सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन मोहेकर यांनी दिल्याचे सेक्टर ११ वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ पंड्या यांनी सांगितले.कोपरखैरणे रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशनने (सेक्टर ११) या संदर्भात मागील काही महिन्यांपासून जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. संबंधित खात्याचे मंत्री, सचिव, महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण बोर्ड आदींना पत्र पाठवून प्रदूषणास कारणीभूत घटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.