शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ‘झोपु’ योजनेचा पुन्हा जागर

By admin | Updated: November 7, 2016 03:11 IST

शहरातील घरांच्या किमती गगनाला भिडल्याने आठ बाय आठच्या झोपड्यांचे भावही वधारले आहेत. यातच राज्य सरकारने या झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी पुन्हा ‘झोपु’ योजनेचा जागर सुरू केला आहे

कमलाकर कांबळे,  नवी मुंबईशहरातील घरांच्या किमती गगनाला भिडल्याने आठ बाय आठच्या झोपड्यांचे भावही वधारले आहेत. यातच राज्य सरकारने या झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी पुन्हा ‘झोपु’ योजनेचा जागर सुरू केला आहे. मुंबई, नवी मुंबईसह मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील सहा महापालिकांना ही योजना लागू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाची घाई करताना राज्य सरकारला प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी उभारलेल्या बांधकामांचा मात्र यावेळी सुध्दा विसर पडल्याचे दिसून येते. महापालिका हद्दीत सिडको, एमआयडीसी आणि शासकीय जमिनीवर झोपडपट्ट्यांचा विस्तार झालेला आहे. महापालिकेने २00१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात ४१ हजार ८0५ झोपड्या आहेत. यापैकी १९९५ पूर्वीच्या पात्र ठरलेल्या १९,0८९ झोपड्या आहेत, तर अपात्र झोपड्यांची संख्या २२,७१६ आहे. यात सर्वाधिक झोपड्या एमआयडीसीच्या जागेवर आहेत. विशेष म्हणजे दिवसेंदिवस झोपड्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बहुतांशी झोपडपट्ट्यांवर परप्रांतीयांचा वरचष्मा आहे. या झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी झोपु योजना लागू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्य सरकारची ही भूमिका स्वागतार्ह असली तरी असेच धोरण गरजेपोटीच्या बांधकामासंदर्भात का घेतले जात नाही, असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे. सध्या गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. सिडको व महापालिकेने या बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत असंतोष खदखदत आहे. गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून शासन दरबारी पडून आहे. यापूर्वीच्या आघाडी सरकारने या प्रश्नाला सोयीनुसार बगल दिली. परंतु आता दोन वर्षांपासून राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आहे. या सरकारकडून तरी ही बांधकामे नियमित करणेबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी प्रकल्पग्रस्तांची अपेक्षा आहे. मात्र याच सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. आजही हजारो बांधकामे कारवाईच्या टप्प्यात आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाचे मूळ सुध्दा याच कारवाईमागे दडले आहे. अशा परिस्थितीत गरजेपोटीच्या बांधकामाबाबत प्राधान्याने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. असे असतानाही या प्रश्नाला बगल देत राज्य सरकारने बेकायदा झोपड्या अधिकृत करण्यासाठी घेतलेला निर्णय संभ्रम निर्माण करणारा असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे मत आहे.