शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

शहरात तीन वर्षांत ४२०० कोटी रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:56 IST

महापालिकेने तीन वर्षांमध्ये तब्बल ४२०० कोटी रुपये खर्च केले आहेत; परंतु या काळात एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झालेला नाही.

नामदेव मोरे नवी मुंबई : महापालिकेने तीन वर्षांमध्ये तब्बल ४२०० कोटी रुपये खर्च केले आहेत; परंतु या काळात एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झालेला नाही. अर्थसंकल्पातील सर्व महत्त्वाच्या योजना कागदावरच अद्याप असून, तीनही वर्षांचे अर्थसंकल्प प्रत्यक्षात अर्थहीन ठरले आहेत.नवी मुंबई महानगरपालिका नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश केला जातो व अशक्यप्राय वाटणारे प्रकल्प प्रत्यक्ष साकारण्यात येतात. स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी पहिली महापालिका होण्याचा बहुमान मिळविला आहे. दुष्काळात सर्वत्र पिण्यासाठी पाणी मिळत नसताना नवी मुंबईमध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. देशातील सर्वात चांगली घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, भव्य मुख्यालय, आंबेडकर भवन, खासगी शाळांपेक्षाही चांगल्या दर्जाच्या पालिका शाळांच्या इमारती, तब्बल २०० उद्याने, देशात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे उभारण्यात आली. पालिकेने स्वत:च्या खर्चाने ठाणे-बेलापूर रोडचे काँक्रीटीकरण करून वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला. गत तीन वर्षांमध्ये महापालिकेने अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश केला, परंतु प्रत्यक्षात एकही प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. तीन वर्षांमध्ये तब्बल ४२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा प्रचंड खर्च करून शहराच्या लौकिकात भर टाकणारा कोणताच प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही.२०१५ - १६ या आर्थिक वर्षामध्ये निधी नसल्यामुळे तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मोठ्या योजना राबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. नवीन निवडून आलेल्या काही नगरसेवकांना एक वर्षामध्ये एकही महत्त्वाचे काम प्रभागात करता आले नव्हते. २०१६ - १७ या वर्षामध्ये तुकाराम मुंढे व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संवाद पूर्णपणे थांबला होता. यामुळे एकही महत्त्वाची योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. पालिकेने अर्थसंकल्पामध्ये मोरबे धरण सुशोभीकरण, मोरबे धरण सौरऊर्जा प्रकल्प, सागरी किनारा सुशोभीकरण, आगरी कोळी सांस्कृतिक भवन, गवळीदेव पर्यटन केंद्र, अडवली भुतावलीमध्ये निसर्ग उद्यान विकसित करणे, छत्रपती शिवाजी महाराज, थोर राष्ट्रीय पुरुष व शहीद व्यक्तींचे स्मारक उभारणे, वॉटर बॉडी विकसित करणे, शहर संग्रहालय, कृत्रिम चौपाटी विकसित करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. परंतु यामधील कोणतीच योजना प्रत्यक्षात पूर्ण होऊ शकलेली नाही. बाल भवन, तरण तलावासह सर्व योजना कागदावर आहेत. विशेष प्रकल्प राबविण्यात आलेला नसतानाही तीन वर्षांत ४२०० कोटी रुपये खर्च झाले असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून पुढील वर्षभरात तरी भविष्याचा वेध घेऊन विकास योजना राबविल्या जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रकल्पाचे नाव तरतूद खर्चसागरी किनारा सुशोभीकरण १० लाख ०गवळीदेव पर्यटन स्थळ १ लाख ०प्रवेशद्वार ५ कोटी ०महापुरूषांची स्मारके १२ कोटी ०वॉटर बॉडी सुशोभीकरण १० कोटी २७ लाखशहर संग्रहालय १ कोटी ०कृत्रिम चौपाटी ५ कोटी ०सायंटिफिक म्युझियम २ कोटी ०नाना नानी पार्क ५० लाख ०वंडर्स पार्क संगीत कारंजे २ कोटी ०रात्र निवारा केंद्र ४ कोटी ३ लाखज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र १ कोटी ७६ लाख ०पक्षी व प्राणी संग्रहालय १० लाख ०श्वान नियंत्रण केंद्राची उभारणी ६ कोटी ०क्रीडा संकुल बांधणे १६ कोटी ५३ लाख २ कोटीतरण तलाव ५ कोटी ०