शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

शहरात तीन वर्षांत ४२०० कोटी रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:56 IST

महापालिकेने तीन वर्षांमध्ये तब्बल ४२०० कोटी रुपये खर्च केले आहेत; परंतु या काळात एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झालेला नाही.

नामदेव मोरे नवी मुंबई : महापालिकेने तीन वर्षांमध्ये तब्बल ४२०० कोटी रुपये खर्च केले आहेत; परंतु या काळात एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झालेला नाही. अर्थसंकल्पातील सर्व महत्त्वाच्या योजना कागदावरच अद्याप असून, तीनही वर्षांचे अर्थसंकल्प प्रत्यक्षात अर्थहीन ठरले आहेत.नवी मुंबई महानगरपालिका नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश केला जातो व अशक्यप्राय वाटणारे प्रकल्प प्रत्यक्ष साकारण्यात येतात. स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी पहिली महापालिका होण्याचा बहुमान मिळविला आहे. दुष्काळात सर्वत्र पिण्यासाठी पाणी मिळत नसताना नवी मुंबईमध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. देशातील सर्वात चांगली घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, भव्य मुख्यालय, आंबेडकर भवन, खासगी शाळांपेक्षाही चांगल्या दर्जाच्या पालिका शाळांच्या इमारती, तब्बल २०० उद्याने, देशात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे उभारण्यात आली. पालिकेने स्वत:च्या खर्चाने ठाणे-बेलापूर रोडचे काँक्रीटीकरण करून वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला. गत तीन वर्षांमध्ये महापालिकेने अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश केला, परंतु प्रत्यक्षात एकही प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. तीन वर्षांमध्ये तब्बल ४२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा प्रचंड खर्च करून शहराच्या लौकिकात भर टाकणारा कोणताच प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही.२०१५ - १६ या आर्थिक वर्षामध्ये निधी नसल्यामुळे तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मोठ्या योजना राबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. नवीन निवडून आलेल्या काही नगरसेवकांना एक वर्षामध्ये एकही महत्त्वाचे काम प्रभागात करता आले नव्हते. २०१६ - १७ या वर्षामध्ये तुकाराम मुंढे व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संवाद पूर्णपणे थांबला होता. यामुळे एकही महत्त्वाची योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. पालिकेने अर्थसंकल्पामध्ये मोरबे धरण सुशोभीकरण, मोरबे धरण सौरऊर्जा प्रकल्प, सागरी किनारा सुशोभीकरण, आगरी कोळी सांस्कृतिक भवन, गवळीदेव पर्यटन केंद्र, अडवली भुतावलीमध्ये निसर्ग उद्यान विकसित करणे, छत्रपती शिवाजी महाराज, थोर राष्ट्रीय पुरुष व शहीद व्यक्तींचे स्मारक उभारणे, वॉटर बॉडी विकसित करणे, शहर संग्रहालय, कृत्रिम चौपाटी विकसित करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. परंतु यामधील कोणतीच योजना प्रत्यक्षात पूर्ण होऊ शकलेली नाही. बाल भवन, तरण तलावासह सर्व योजना कागदावर आहेत. विशेष प्रकल्प राबविण्यात आलेला नसतानाही तीन वर्षांत ४२०० कोटी रुपये खर्च झाले असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून पुढील वर्षभरात तरी भविष्याचा वेध घेऊन विकास योजना राबविल्या जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रकल्पाचे नाव तरतूद खर्चसागरी किनारा सुशोभीकरण १० लाख ०गवळीदेव पर्यटन स्थळ १ लाख ०प्रवेशद्वार ५ कोटी ०महापुरूषांची स्मारके १२ कोटी ०वॉटर बॉडी सुशोभीकरण १० कोटी २७ लाखशहर संग्रहालय १ कोटी ०कृत्रिम चौपाटी ५ कोटी ०सायंटिफिक म्युझियम २ कोटी ०नाना नानी पार्क ५० लाख ०वंडर्स पार्क संगीत कारंजे २ कोटी ०रात्र निवारा केंद्र ४ कोटी ३ लाखज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र १ कोटी ७६ लाख ०पक्षी व प्राणी संग्रहालय १० लाख ०श्वान नियंत्रण केंद्राची उभारणी ६ कोटी ०क्रीडा संकुल बांधणे १६ कोटी ५३ लाख २ कोटीतरण तलाव ५ कोटी ०