शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

एलआयसीच्या कारभाराचा वाशीतील नागरिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 01:06 IST

ग्राहकांची तारांबळ; योजनेतील पैशांच्या परताव्यासाठी रांगा

नवी मुंबई : एलआयसीच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसला आहे. विविध योजनांतील पैशांचा परतावा घेण्यासाठी ग्राहकांना कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांसह एलआयसीचे एजेंटही नाराज आहेत.कोरोनाच्या टाळेबंदीचा सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. अनेकांची नोकरी गेल्याने घरखर्च चालविणे अवघड होऊन बसले आहे. मुलांचे शैक्षणिक शुल्क भरताना पालकांची ओढताण होत आहे. त्यामुळे भविष्याची तरतूद म्हणून एलआयसीच्या विविध योजनांत गुंतविलेले पैसे परत काढण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. त्यानुसार अनेकांनी आपल्या एलआयसीच्या पॉलिसी मुदतीअगोदर रद्द करून पैसे काढून घेण्यावर भर दिला आहे. मात्र एलआयसीच्या वाशी कार्यालयाचा संथ करभार ग्राहकांच्या रोषाचे कारण ठरला आहे. कोणत्याही योजनेतील पैशांचा परतावा घेण्यासाठी पूर्वी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागायचा. परंतु आता अर्ज करून एक ते दीड महिना झाला तरी ग्राहकांना पैसे मिळत नाहीत. परिणामी, दररोज कार्यालयात रांगा लागत आहेत. मनुष्यबळाची कमतरता असल्याची कारणे तेथील कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहेत. प्रत्यक्षात मात्र सध्या पूर्वीइतकाच कर्मचारी वर्ग कार्यालयात कार्यरत असल्याचे ग्राहक सांगतात. असे असतानाही कर्मचाऱ्यांकडून कामांत दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना दररोज कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत आहेत. पॉलिसी रद्द केल्यानंतर परतावा मिळण्यास विलंब तर होतच आहे, त्याशिवाय कार्यालयातील इतर कामेसुद्धा कूर्मगतीने सुरू असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या या मनमानीला ग्राहकच नव्हे, तर एलआयसी एजेंटसुद्धा वैतागले असून, या प्रकरणी ठाणे येथील विभागीय कार्यालयाकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. दरम्यान, यासंदर्भात एलआयसीच्या वाशी कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक रवी कनकापूरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.पैशांची तातडीची अडचण निर्माण झाल्याने मुलांच्या नावावरील पॉलिसी रद्द करण्यासाठी ३ नोव्हेंबर रोजी वाशी कार्यालयात अर्ज केला. परंतु एक महिना उलटला तरी यासंदर्भात काहीही कार्यवाही झाली नाही. कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.- लक्ष्मण जोगुला, ग्राहक (कोपरखैरणे)

टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसी