शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:25 IST

आगीच्या घटनांत वाढ : महावितरणचे दुर्लक्ष

नवी मुंबई : शहरातील अनेक भागात ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, काही ठिकाणी केबल्सना आग लागण्याचेही प्रकार घडत आहेत.

नवी मुंबईकरांवर महावितरणच्या भारनियमनाचे संकट नसले तरीही कोणत्या ना कोणत्या कारणाने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. कोपरखैरणे व घणसोली परिसरात असे प्रकार सातत्याने घडत आहेत. मागील काही दिवसांपासून कोपरखैरणे गाव व लगतच्या परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. रात्री अपरात्री बत्ती गुल होत असल्याने ऐन गरमीत नागरिकांचे हाल होत आहेत. अशाच प्रकारातून गतवर्षी नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाला मध्यरात्रीच्या सुमारास घेराव घातला होता.

यंदा पुन्हा विजेचा लपंडाव सुरू झाल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे घणसोलीतही काही दिवसांपासून महावितरणची बत्ती गुल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी घणसोली गावापुरता मर्यादित असलेला विजेचा लपंडाव कॉलनी परिसरात देखील सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी डी-मार्ट मॉललगत एका ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे खोदकामा वेळी महावितरणची वायर तुटली. त्यामुळे संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तर शनिवारी दुपारी घणसोली रेल्वेस्थानकासमोरील मार्गालगतच्या पदपथावरून नेलेल्या विद्युत वायरीमध्ये शॉर्टसर्किट झाले.

महावितरणकडून वेळी अवेळी होत असलेल्या विजेच्या लपंडावाचा परिणाम नागरिकांच्या कामकाजावर होत आहे. स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अनेक छोटे-मोठे आयटी उद्योग चालत आहेत. तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित संगणकीय खासगी तसेच व्यावसायिक कामे घरोघरी चालत आहेत.

अशावेळी विजेचा लपंडाव झाल्यास सुरू असलेल्या तंत्रज्ञानात देखील बिघाडाच्या शक्यतेची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे अनपेक्षित दुर्घटना वगळता इतर वेळी वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी वीज ग्राहकांना महावितरणकडे नोंद असलेल्या मोबाइलवर संदेश पाठवून पूर्वकल्पना देण्याची मागणी केली जात आहे.