शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:23 IST

गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ग्रामीण भागात तासन्तास वीज गायब होत आहे. सोमवारी १ जुलै रोजी सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

पनवेल : गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ग्रामीण भागात तासन्तास वीज गायब होत आहे. सोमवारी १ जुलै रोजी सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.शुक्रवार, २८ जूनपासून दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे. मात्र दर दिवशी वीज पुरवठा खंडित होत आहे. जुनाट केबल, गंजलेले विजेचे खांब, उघड्या डीपी यामुळे वीज जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सतत वीज खंडित होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस देखील वीज पुरवठा खंडित होत असल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री कोणत्याही वेळी वीज गायब होत असल्याने नक्की वीज कोणत्या वेळेला असते असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. वारंवार वीज गायब होत असली तरी देखील वीज बिल कमी होण्याचे नाव घेत नाही. पनवेल तालुक्यात महावितरणचे लाखो वीज ग्राहक आहेत. मात्र दररोज त्यांना विजेचा लपंडाव सहन करावा लागत आहे.तालुक्यातील मोरबे कोंडले परिसरात दोन दिवसात विजेचा खांब पडल्याने त्यांना रात्रभर अंधारात राहावे लागले. तर शुक्रवारी ४ तास, शनिवारी ३ तास, रविवारी ४ तास व सोमवारी सकाळी ७ वाजता गेलेली वीज दुपारी १२ वाजता आली. तालुक्यातील गावांमध्ये वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना कित्येक तास विजेविना राहावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात वीज नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दिवसभरात १० ते १२ वेळा वीज गूल असते. सततच्या विजेच्या जाण्यामुळे विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत. दिवसा वीज जातेच शिवाय रात्री देखील वीज जात असल्याने व्यवस्थित झोप देखील मिळत नसल्याची व्यथा नागरिक मांडत आहेत. दिवसातील चार ते पाच तास वीज नसते. विजेची समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :panvelपनवेल