शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:23 IST

गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ग्रामीण भागात तासन्तास वीज गायब होत आहे. सोमवारी १ जुलै रोजी सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

पनवेल : गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ग्रामीण भागात तासन्तास वीज गायब होत आहे. सोमवारी १ जुलै रोजी सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.शुक्रवार, २८ जूनपासून दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे. मात्र दर दिवशी वीज पुरवठा खंडित होत आहे. जुनाट केबल, गंजलेले विजेचे खांब, उघड्या डीपी यामुळे वीज जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सतत वीज खंडित होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस देखील वीज पुरवठा खंडित होत असल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री कोणत्याही वेळी वीज गायब होत असल्याने नक्की वीज कोणत्या वेळेला असते असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. वारंवार वीज गायब होत असली तरी देखील वीज बिल कमी होण्याचे नाव घेत नाही. पनवेल तालुक्यात महावितरणचे लाखो वीज ग्राहक आहेत. मात्र दररोज त्यांना विजेचा लपंडाव सहन करावा लागत आहे.तालुक्यातील मोरबे कोंडले परिसरात दोन दिवसात विजेचा खांब पडल्याने त्यांना रात्रभर अंधारात राहावे लागले. तर शुक्रवारी ४ तास, शनिवारी ३ तास, रविवारी ४ तास व सोमवारी सकाळी ७ वाजता गेलेली वीज दुपारी १२ वाजता आली. तालुक्यातील गावांमध्ये वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना कित्येक तास विजेविना राहावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात वीज नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दिवसभरात १० ते १२ वेळा वीज गूल असते. सततच्या विजेच्या जाण्यामुळे विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत. दिवसा वीज जातेच शिवाय रात्री देखील वीज जात असल्याने व्यवस्थित झोप देखील मिळत नसल्याची व्यथा नागरिक मांडत आहेत. दिवसातील चार ते पाच तास वीज नसते. विजेची समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :panvelपनवेल