शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

पनवेलसह शहरात मुसळधार; विविध भागांमध्ये पाणी साचले; ७ ठिकाणी वृक्ष कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 05:11 IST

मुसळधार पावसाने नवी मुंबईसह पनवेलला झोडपले. दोन्ही मनपा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते. वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या असून, महामार्गावर अपघात झाल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती.

नवी मुंबई, पनवेल : मुसळधार पावसाने नवी मुंबईसह पनवेलला झोडपले. दोन्ही मनपा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते. वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या असून, महामार्गावर अपघात झाल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती. पनवेलमध्ये इमारत कोसळण्याचीही घटना घडली आहे.नवी मुंबईसह पनवेल परिसरामधील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले होते. मुंबईमध्ये रेल्वेपूल कोसळल्यामुळे अनेकांना कार्यालयात पोहोचता आले नाही. हार्बर मार्गावरील लोकलही उशिराने धावत होत्या. सायन-पनवेल महामार्गावर कळंबोलीजवळ पाणी साचल्याचा परिणामही वाहतुकीवर झाला होता. तुर्भे येथे मिनीबसचा अपघात झाल्यामुळे सानपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यवहारावरही परिणाम झाला होता. भाजी व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनांना व नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला होता. मार्केट परिसरामधील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.वारंवार तक्रारी करूनही येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील भुयारी मार्गांमध्येही पाणी साचले होते.ठाणे-बेलापूर रोडवर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापे येथे भुयारी मार्ग तयार केला आहे; परंतु या ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे त्याचा फटका वाहतुकीस बसू लागला आहे.औद्योगिक वसाहतीमधील नैसर्गिक नाल्यांमध्ये डेब्रिज व इतर कचरा टाकला असल्यामुळे नाल्यातील पाणी रोडवर येऊ लागले आहे. ऐरोलीमधील बस डेपोसह अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पनवेलमध्येही अनेक ठिकाणी पाणी साचल्याची घटना घडली होती. इमारत कोसळल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मलमिश्रीत पाणी रस्त्यावरमुसळधार पावसामुळे सारसोळे गावामध्ये मलमिश्रीत पाणी रस्त्यावरून वाहत होते. मलवाहिन्या तुंबल्याने जागोजागी ही परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पादचाºयांसह परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी पालिका अधिकाºयांना ही बाब कळवली असता, सफाई कामगारांनी तुंबलेल्या मलवाहिन्या सफाईचे काम हाती घेतले; परंतु पावसाळ्यापूर्वीच जर योग्यरीत्या नाले, गटारे व मल:निसारण वाहिन्यांची साफसफाई झाली असती, तर ही परिस्थितीच उद्भवली नसती. मात्र, अधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे सारसोळेवासीयांना दूषित पाण्यातून चालावे लागत असल्याचाही संताप मेहेर यांनी व्यक्त केला.पावसात खड्डे बुजविण्याचा प्रयत्नमहापालिका अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे शहरात काही ठिकाणी पाऊस सुरू असताना रोड व पदपथांची कामे सुरू आहेत. नेरूळ सेक्टर २० मध्ये रोडचे डांबरीकरण करण्यात आले आहे. गोठविली गावामध्ये मुसळधार पावसामध्ये खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पावसात सुरू असलेल्या या कामाविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.लोकलचीगती मंदावलीपावसामुळे पनवेल-सीएसएमटी तसेच ठाणे-वाशी मार्गावरील लोकलवरही परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे समोरील परिस्थितीचा अंदाज येत नसल्याने लोकल धिम्या गतीने पळवल्या जात होत्या, यामुळे सर्वच लोकल नियोजित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. याचा त्रास रेल्वेप्रवाशांना सहन करावा लागला.भुयारी मार्गात पाणीप्रतिवर्षी पावसाळ्यात शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांचे पादचारी, तसेच वाहनांचे भुयारी मार्ग पाण्याखाली जातात. त्यानुसार मंगळवारीही कोपरखैरणे रेल्वेस्थानकालगतच्या भुयारी मार्गात सुमारे दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. एरवी त्या ठिकाणी साचणारे पाणी मोटार लावून बाहेर काढले जाते. मात्र, कायमचा तोडगा म्हणून त्या ठिकाणी पाझरणारे पाणी कायमचे बंद करण्याची शक्कल अद्याप अभियंत्यांना सुचलेली नाही, त्यामुळे मंगळवारी पावसाचा जोर वाढताच त्या ठिकाणी पाणी साचून रहदारीच्या मार्गात अडथळा झाला.वाशीत रस्त्यावर तळेसेक्टर ९ परिसरातील जलमय होऊन रस्ते पाण्याखाली जात आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांकडून रस्त्यालगतच्या गटारांमध्ये कचरा टाकला जात असल्याने पाणी तुंबून ते रस्त्यावर साचत आहे. परिणामी, मुसळधार पाऊस झाल्यास परिसरातील घरांमध्येही पाणी शिरण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते गणेश मिलखे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई