शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

अनेक भूधारकांकडून भूखंडाचा विकास नाही, सिडकोचा दणका, १६ भूखंड केले रद्द

By कमलाकर कांबळे | Updated: April 5, 2025 13:14 IST

CIDCO News: अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवाशुल्क भरण्यासाठी अभय योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूधारकांविरोधात सिडकोने कारवाईचा आसूड उगारला आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई - अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवाशुल्क भरण्यासाठी अभय योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूधारकांविरोधात सिडकोने कारवाईचा आसूड उगारला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात वाटप केलेले १६ भूखंड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून या भूखंडांवर जप्तीचaी कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित भूखंडधारकांचे धाबे दणाणले आहेत. 

सिडको भूखंडाचे वाटप झाल्यापासून निर्धारित कालावधीत बांधकाम पूर्ण करून भोगवटा प्रमाणपत्र घेणे नियमाने बंधनकारक आहे.  मात्र, अनेकांनी आपल्या भूखंडांचा विकास केला नसल्याचे आढळले आहे. त्याचप्रमाणे अनेक भूधारकांनी अतिरिक्त भाडेपट्टा आणि सेवाशुल्क थकविल्याचे निदर्शनास आले आहे, अशा भूधारकांसाठी सिडकोने अभय योजनेतून थकीत रकमेवर ५० टक्के सवलत दिली होती. या याेजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी अनेक भूधारकांनी त्याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे अशा १६ भूधारकांना सिडकोने नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर या भूखंडांचे वाटप रद्द करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. 

भूखंडांची किंमत दाेन हजार कोटीरद्द करण्यात आलेले भूखंड ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, बेलापूर, खारघर तसेच द्रोणागिरी नोडमधील आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७५,००० चौरस मीटर इतके आहे. बाजारभावाप्रमाणे त्याची किमत दोन हजार कोटीच्या घरात असल्याचा अंदाज आहे.  यातील काही भूखंड १० ते २५  वर्षांपासून वापराविना पडून आहेत. कोपरखैरणेतील चाणक्य गृहनिर्माण सोसायटीने प्राप्त भूखंडावर बांधकाम करून निवासी वापर सुरू केला असला, तरी भोगवटा प्रमाणपत्र नाही. नेरूळ येथील सिडको कर्मचाऱ्यांच्या स्नेह पुष्प सोसायटीस दिलेल्या भूखंडाचा विकास न करता त्याची परस्पर विक्री केल्याची तक्रार आहे.

अभय योजनेकडे पाठ अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवा शुल्कापोटी सिडकोचे ९०० कोटी रुपये अडकून आहेत. अभय योजनेअंतर्गत ५० टक्के  सूट दिल्याने  किमान साडेचारशे कोटी महसूल प्राप्त होईल, अशी अपेक्षा होती.  मात्र, मुदतवाढ देऊनही भूधारकांनी पाठ फिरविली.  त्यामुळे जेमतेम १०० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर समाधान मानावे लागले. 

भूखंडाचा भाडेकरार झाल्यानंतर चार वर्षात विकास करणे बंधनकारक आहे. शुल्क भरून मुदतवाढीची तरतूद आहे. त्यासाठी अभय योजना राबवली. मात्र त्यालाही भूधारकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे भूखंड रद्दचा निर्णय घेतला आहे. - विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक सिडको 

टॅग्स :cidcoसिडको लॉटरीNavi Mumbaiनवी मुंबई