शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

इर्शाळवाडी आपत्ती ग्रस्तांसाठी सिडको बांधणार घरे

By कमलाकर कांबळे | Updated: July 31, 2023 21:28 IST

चौक-मानिवली या गावातील सुमारे पाच एकर जागेवर ही घरे प्रस्तावित केली आहेत

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पालघर तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीतील आदिवासींसाठी घरे बांधण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली आहे. चौक-मानिवली या गावातील सुमारे पाच एकर जागेवर ही घरे प्रस्तावित केली आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांसह सिडकोच्या संबंधित विभागाने या जागेची पाहणी केली असून अंतिम आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान पुढील पावसाळ्यापूर्वी बेघर झालेल्या इर्शाळवाडीतील आदिवासींचे नवीन घरांत पुनर्वसन करण्याची योजना असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर १९ जुलै रोजी दरड कोसळून भीषण आपत्ती ओढवली होती. इर्शाळवाडीत एकूण ४३ आदिवासी कुटुंबे राहत होती. त्यांची एकूण लोकसंख्या २२९ इतकी होती. त्यापैकी २७ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या दुर्घटनेत संपूर्ण गावाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. बेघर झालेल्या या आदिवासी कुटुंबांसाठी याच परिसरात सिडकोच्या माध्यमातून घरे बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीपासून काहीच अंतरावर असलेल्या चौक मानिवली येथील शासकीय जागा या प्रकल्पासाठी निश्चित केली आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांसमवेत नियोजित जागेची पाहणी केली. त्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी सोमवारी रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्याशी चर्चा केली.

पुढील पावसाळ्यापूर्वी ४३ घरे

या जागेवर ४३ घरे बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुढील पावसाळ्यापूर्वी या नवीन घरांत येथील आदिवासींचे पुनर्वसन करण्याची योजना असल्याचे डिग्गीकर यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :cidcoसिडको