शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

जलवाहतूक सुरू करण्यासाठी सिडकोने कसली कंबर

By कमलाकर कांबळे | Updated: February 5, 2024 21:05 IST

संचालन, देखभालीसाठी खासगी संस्थेचा शोध

नवी मुंबई : मेट्रो सेवा सुरू केल्यानंतर सिडकोने आता नेरूळ जेट्टी ते मुंबईदरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हलचाली सुरू केल्या आहेत. खासगी संस्थेच्या माध्यमातून ही सेवा पुरविण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी इच्छुक संस्थेकडून प्रस्ताव मागविले आहेत. पुढील दोन महिन्यात ही सेवा सुरू करण्याची सिडकोची योजना असल्याची माहिती सूत्राने दिली.

मुंबई ते नवी मुंबईदरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिडकोने नेरूळ येथे सुमारे १११ कोटी रुपये खर्चून सुसज्ज जेट्टी बांधली आहे. परंतु, मागील दोन वर्षांपासून ही जेट्टी धूळखात पडली आहे. वापर नसल्याने तिच्या देखभालीवर सिडकोला लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत.एप्रिल २०१८ मध्ये या जेट्टीच्या उभारणीला मंजुरी मिळाली होती.

विशेष म्हणजे हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोनाचा संसर्ग आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे हे काम काही प्रमाणात रखडले होते. परंतु, सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी कोरोनाच्या प्रतिकूल काळातही सप्टेंबर २०२१ मध्ये या जेट्टीचे काम पूर्ण करून घेतले. तेव्हापासून विविध कारणांमुळे ही जेट्टी वापराविना पडून आहे. ही बाब लक्षात घेऊन सिडकोचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दीर्घकाळ रखडलेली जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नेरूळ जेट्टीचे संचलन, देखभाल, पर्यटनासह पर्यटन सुविधा देण्यासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविले आहेत. विशेष म्हणजे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दीर्घकाळ रखडलेल्या मेट्रोचे लोकार्पण करून नवी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. त्याच धर्तीवर पुढील दोन तीन महिन्यात नवी मुंबई ते मुंबईदरम्यान नेरूळ जेट्टीवरून जलवाहतूक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी कंबर कसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

बेलापूर जेट्टीवरून प्रवास महागडाबेलापूर येथे मेरिटाईम बाेर्डाने जेट्टी बांधली आहे. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी या जेट्टीवरून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. परंतु, त्याचे दर अव्वाच्या सव्वा असल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरविली आहे. या पार्श्वभूमीवर बेलापूर ते मुंबईदरम्यानचे तिकीट दर कमी करावेत, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने जलवाहतूक सेवा सुरू करताना तिकीट दर कमी ठेवावेत, अशी मागणी आतापासूनच नवी मुंबईकरांकडून केली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई