शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निवासी नळजोडणी धारकांसाठी सिडकोने आणली अभय योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 23:41 IST

थकीत बिले वसूल करणार : विलंब शुल्क वगळून चार हप्ते

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : साडेबारा टक्के भूखंडांवर उभारलेल्या निवासी इमारतीतील रहिवाशांची मोठ्या प्रमाणात पाणी देयके थकली आहेत. ही थकीत बिले  वसूल करण्यासाठी सिडकोने अभय योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत संबंधित नळजोडणीधारकाला विलंब शुल्क माफ केले जाणार आहे. १ मार्च २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीसाठी ही योजना कार्यरत असणार आहे. 

पनवेल महापालिका क्षेत्र आणि सिडको कार्यक्षेत्रात साडेबारा टक्के भूखंडावर मोठ्या प्रमाणात निवासी इमारती उभारल्या आहेत. नियमानुसार या भूखंडांवर १५ टक्के वाणिज्यिक तर ८५ टक्के क्षेत्राचा निवासी वापर करता येतो. परंतु अनेक भूखंडधारकांनी या नियमाला हरताळ फासला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा शेकडो गृहनिर्माण संस्थांना संबंधित प्राधिकरणांनी भोगवटा प्रमाणपत्र नाकारले आहे. याचा परिणाम म्हणून या  गृहनिर्माण संस्थांना  वाणिज्यिक दराने पाणी बिले भरावी लागत आहेत.  ही बिले भरमसाट असल्याने अनेकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. पाणी देयकाची ही थकीत वसुली करण्याच्या दृष्टीने सिडकोने राज्य सरकारच्या मान्यतेनंतर अभय योजना जाहीर केली आहे. 

 या योजनेचा लाभ घेणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी आपल्या एकूण थकबाकीची रक्कम विलंब शुल्क वगळून समान चार हप्त्यांत भरायची आहे. ही रकम भरल्यानंतर  भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित गृहनिर्माण संस्थेला सिडकोकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यासाठी थकबाकीची रक्कम भरल्यानंतर संबंधित गृहनिर्माण संस्थेने त्यासाठी चार महिन्यांच्या आत सिडकोकडे अर्ज करणे अनिवार्य असणार आहे. 

एक वर्षाची कालमर्यादाभोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडे सादर केल्यानंतर संबंधित गृहनिर्माण संस्थेला निवासी दराने पाणी दर लागू केला जाणार आहे. भोगवटा प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत भोगवटा प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांकडून वाणिज्यिक दराने पाणी देयके वसूल केली जातील. त्यांना अभय योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.