शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

मिरचीचा ठसका, उत्पादन घटल्याने दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:54 IST

यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे

प्राची सोनवणे  नवी मुंबई : यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांची वर्षभराचा मसाला बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून बाजारात मसाल्याची मिरची आणि अख्खा गरम मसाला घेण्यासाठी महिलांची गर्दी वाढू लागली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मसाल्याच्या मिरचीचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. राज्यात आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातील मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत असून दरवर्षीपेक्षा मिरचीच्या भावात या वर्षी वाढ झाली आहे.गतवर्षी आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांना मिरचीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे उभे पीक जाळून देण्याची वेळ आली होती. त्यामुळे यावर्षी मिरचीच्या प्रमुख लागवड क्षेत्रात घट झाली आहे. परिणामस्वरूप उत्पादनात घट झाल्यामुळे यावर्षी मागणी जास्त व पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे मिरचीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती विक्रेते किशोर रविपती यांनी दिली. आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र या प्रांतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होते. आंध्रप्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीमुळे मिरचीचे उत्पादन अधिक होते. गुंटूर परिसरात उत्पादित होणाºया मिरचीला गुंटूर मिरची तर खम्मम परिसरात उत्पादित होणाºया मिरचीस तेजा मिरची म्हणून ओळखले जाते. कर्नाटक प्रांतातील बेडगी परिसरात उत्पादित होणाºया मिरचीस बेडगी मिरची म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यातील लाल मिरची तिखट असते; पण रंग फिकट असतो. दीर्घ काळ ही मिरची टिकत नसल्यामुळे या मिरचीस मागणी कमी असते. काळा मसाला बनवण्यासाठी मिरची पावडर उत्पादक याचा वापर करतात तर या परिसरातील शेतकरी लाल मिरची न करता हिरवी मिरचीच दररोज विकून नगदी पैसा मिळवतात. देशभरात जानेवारी ते मे महिन्यापर्यंत घरगुती मिरचीची वार्षिक खरेदी केली जाते. याच काळातील लग्नसराईमुळेही मिरचीच्या मागणीत मोठी वाढ होते.घरगुती मागणी प्रकारात बेडगी, गुंटूर व तेजा या जातीच्या मिरचीला मोठी मागणी आहे. जगभर झणझणीत व जास्त तिखट खाणारे लोक खम्ममची तेजा मिरची वापरतात तर रंगास गडद, चवदार, दीर्घकाळ रंग टिकणारी, कमी तिखट अशी बेडगी मिरची खाणारे उच्चशिक्षित लोक असतात. आंध्र प्रदेशात जानेवारी महिन्यापासूनच गुंटूर, वरंगल, खम्मम, हैदराबाद या बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक असते.ओखी वादळ तसेच अवकाळी पावसामुळे यंदा मिरचीच्या गुणवत्तेत आणि उत्पादनातही घट झाली असून परिणामी, आवक कमी झाल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला १२ गाड्या मिरचीची आवक केली जात आहे.गेल्या वर्षी ६० ते ८० रुपये किलो दराने विकली जाणारी मिरची यंदा बाजारात ९० ते १२० रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध असून दरात ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. मसाल्यासाठी कर्नाटकवरून येणारी बेडगी, काश्मिरी, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशमधून येणारी गुंटूर आणि महाराष्ट्रातील तिखट तेजा मिरचीबरोबर आंध्रप्रदेशमधून येणाºया रेशमपट्टी मिरचीलाही मोठी मागणी आहे. महाराष्ट्रीयन जास्त प्रमाणात बेगडी, काश्मिरी आणि तेजा मिरचीचा वापर करतात. रेशमपट्टीला गुजरातीवर्गाकडून मोठी मागणी असते. ही मिरची कमी तिखट असते.